शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

२४ उपायांना टंचाईत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:07 IST

जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आता अनेक भागात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता वाढत चालली आहे. काही भागात तर प्रशासनाला याबाबत माहिती असूनही काही ठिकाणी टंचाईकडे कानाडोळा होत आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २४ ठिकाणी टंचाईवरील उपायांना मंजुरी दिली असून ही कामे व्हायला पावसाळा उजाडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.दरवर्षीच काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. काही ठराविक गावांमध्ये तर टँकरशिवाय पर्याय राहात नाही. अशा गावांना कायमस्वरुपी उपाय केला नाही. यंदा जि.प.कडून जवळपास ५२ गावांचे टंचाईत पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात शंका आल्याने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तहसीलदारांनी यात तपासणी करून वस्तूनिष्ठ अहवाल द्यावा, असे बजावले होते. मात्र हिंगोली वगळता इतर कोणत्याही तालुक्याने वेळेत अहवाल दिला नाही. त्यामुळे हे प्रस्ताव तसेच पडून होते. आता अहवाल येताच जिल्हाधिकाºयांनी उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. यात हिंगोली तालुक्यातील वडदला १.६0 लाख, पांगरीला-२.७३ लाख, इडोळीला ४.0५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.सेनगाव तालुक्यात गणेशपूरला-४.0२ लाख, पानकनेरगाव- २.८९ लाख, कहाकर बु.-२.२४, धनगरवाडी-२.१३, धानोरा बंजारा-२.0७, खडकी- २.९८, धोतरा-३.८५, भगवती-१.९0 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तीनच तालुक्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून वसमत, औंढ्याचे बाकी आहेत. यापैकी औंढा येथील प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने दुरुस्ती करून पाठविण्यास सांगितले आहे.कळमनुरी तालुक्यात टंचाईत सर्वाधिक १३ नळयोजना दुरुस्त्या मंजूर झाल्या आहेत. यामध्ये झुनझुनवाडी-३.४१ लाख, कुंभारवाडी-२.४६ लाख, दाती-२.६२ लाख, नवखा-२.५४ लाख, खरवड-१४.५७ लाख, डिग्गी-२.७१ लाख, तरोडा-२.६१ लाख, सिंदगी-६.१0 लाख, कुर्तडी-२.२२ लाख,पेठवडगाव-२.८७ लाख, बोल्डा-२.९४ लाख, कवडा-२ लाख अशी एकूण ६५ लाखांची कामे मंजूर झाली आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतरही या तालुक्यात मात्र गावांची संख्या भरपूर असून काही ठिकाणचे यापूर्वी टँकरचे प्रस्ताव यायचे.कळमनुरी तालुक्यातील शिवनी खु. येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पाईपलाईन तुटली होती. तेव्हापासून हे गाव टंचाईत होते. १८ लाख मंजूर झाल्याने ही अडचण दूर होणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीWaterपाणी