शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

४३ पांदण रस्त्यांची २.३७ कोटींची देयके अडकली

By admin | Updated: June 24, 2014 00:13 IST

जालना : ४३ गावांमध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी उपोषण सुरू केले.

जालना : घनसावंगी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीअंतर्गत ४३ गावांमध्ये २०१२-१३ मध्ये केलेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची देयके शासनाकडून अद्याप अदा न झाल्याने नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. मात्र राजकीय मंडळींच्या मध्यस्थीने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले.१५ मे ते १५ जून २०१४ या कालावधीत शासनाने महात्मा गांधी नरेगा अंतर्गत २०१३-१४ व त्यापूर्वीची प्रलंबित मजुरी व देयके अदा करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. मात्र या मोहिमेत घनसावंगी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ४३ गावांमध्ये झालेल्या पांदण रस्त्यांच्या खडीकरणाची २ कोटी ३७ लाख रुपयांची देयके अदा झाली नाहीत.त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणार्थींमध्ये सुंदर काळे (लिंबोनी), श्रीरंग गुजर (अरगडे गव्हाण), पंढरीनाथ साबळे (कोठाळा), एकनाथ काळे (लिंबोनी), रामेश्वर चव्हाण (शिंदे वडगाव), पंढरीनाथ काळे, विठ्ठल नाईक (पाडोळी), किशोर जाधव (खडका) आणि मदन जाधव (खडका) यांचा सहभाग होता. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या अ‍ॅड. कीर्ती उढाण, सेना उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जि.प. सदस्य श्यामराव उढाण, भाऊसाहेब घुगे यांनी सायंकाळी ५ वाजता उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी मध्यस्थी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करण्याची मागणी केली. याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणार्थींनी मान्यवरांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)देयके अदा करणारशासनाच्या आदेशानुसार सदरील गावांमधील पांदण रस्त्याच्या खडीकरणाची देयके लवकरच अदा केली जातील, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी दिल्याचे उपोषणार्थींमधून सांगण्यात आले.