शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पालिका प्रभाग रचना आराखड्यावर २२ आक्षेप

By admin | Updated: July 15, 2016 00:49 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आरखडा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला आहे. सदरील आरखड्यावर आक्षेप नोंदविण्यास

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आरखडा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला आहे. सदरील आरखड्यावर आक्षेप नोंदविण्यास ५ ते १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे २२ आक्षेप दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सुनावणीदरम्यान यातील किती आक्षेप टिकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगर परिषदांची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही युद्धपातळीवर तयारी हाती घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच वॉर्डनिहाय आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार उस्मानाबाद पालिकेअंतर्गत आता आठ ऐवजी १९ प्रभाग झाले आहेत. तर नगरसेवकांची संख्याही ३३ वरून ३९ वर जावून ठेपलुी आहे. दरम्यान, नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमुळे पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले आहेत. असे असतानाच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचे हक्काचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या मंडळीकडून आता सुरक्षित वॉर्डचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर आक्षेप घेण्यासाठी ५ ते १२ जुलै एवढा कालावधी दिला असता सुमारे २२ आक्षेप दाखल झाले आहेत. यामध्ये उस्मानाबादेतील सर्वाधिक ११, मुरूम १, तुळजापूर ६ आणि नळदुर्ग येथील आठ अर्जदारांच्या ८ आक्षेपांचा समावेश आहे. यात उस्मानाबाद शहरातील सह्याद्री संताजी राजेनिंबाळकर यांनी प्रभाग १७ मधील गट क्र. १२१, १२२ प्रभाग १० मध्ये समाविष्ट करण्यात यावेत. लहु पवार यांनी प्रभाग नऊ मधील महादेव गल्ली प्रभाग १० अथवा ११ मध्ये समावेशित करावी. अजित माळी यांनी प्रभाग १७ मधील गट क्र. १२१, १२२ प्रभाग क्र.१० मध्ये समाविष्ठ करावेत. यासमीन वलीम पठाण यांनीही अर्ज केला आहे. भानुनगर हा भाग प्रभाग १० ला जोडावा असे म्हटले आहे. बापू जगन पवार यांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रभाग १४ ऐवजी प्रभाग ७ अथवा १९ मध्ये ठेवावे. सचिन भारत पवार यांनी पोलिस लाईनचा भाग प्रभाग ५ ला जोडावा. अमोल कोरेगावकर यांनी पाथरूड वाड्याचा भाग प्रभाग ७ ला जोडण्यात यावा. तर विद्यानंद बनसोडे यांचे ‘एससी’चे मतदान राखीव प्रभागात ठेवावे, असे म्हणणे आहे. तसा अर्जही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)