शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

मृतसाठ्यातून २१८ दलघमीचा उपसा

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून आतापर्यंत २१८ दलघमीचा उपसा करण्यात आला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून आतापर्यंत २१८ दलघमीचा उपसा करण्यात आला आहे. मृतसाठ्यातून अजूनही १६० दलघमी पाणी उपसा करणे शक्य आहे. उद्योग आणि पिण्याची रोजची गरज आणि बाष्पीभवनाचे प्रमाण पाहता जुलैअखेरपर्यंत हे पाणी सहज पुरू शकेल इतके आहे. वेळेत पाऊस न झाल्यास जुलैअखेर मात्र पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली आहे.जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना शहरांसह लहान-मोठ्या जवळपास २५० गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. याशिवाय औरंगाबाद आणि जालना येथील उद्योगांसाठीही या धरणातून पाणीपुरवठा होतो. या सर्वांसाठी जायकवाडी धरणातून रोज ०.२७ दलघमी इतके पाणी उचलले जाते, तर बाष्पीभवनामुळे धरणातील जवळपास १ दलघमी पाणी रोज वाफेच्या स्वरूपात हवेत उडून जाते. जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा २८ मार्च रोजीच संपला. तेव्हापासून उद्योग आणि शहरांसाठी मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यांतील काही गावांसाठीही मृतसाठ्यातूनच खाली पिण्याकरिता पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत धरणाच्या मृतसाठ्यातून तब्बल २१८ दलघमी इतका पाण्याचा वापर झाला आहे. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. त्यादृष्टीने धरणात अजूनही ५१९ दलघमी इतके पाणी शिल्लक आहे. मात्र, गाळाच्या प्रमाणाचा विचार करता हा साठा ४०० दलघमीच्याच जवळपास आहे. औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी मृतसाठ्यातून कॅनॉलच्या पातळीपर्यंतच पाणी उपसा करणे शक्य आहे. म्हणजे मृतसाठ्यातून जास्तीत जास्त ३८५ दलघमीपर्यंतच पाणी उचलणे शक्य होणार आहे. आतापर्यंत त्यातील २१८ दलघमी पाणी उचलले गेले आहे. त्यामुळे आता १६० दलघमीइतकेच पाणी उचलता येणार आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असा दावा कडाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आणखी तीन महिने अडचण नाहीजायकवाडीच्या मृतसाठ्यातून पूर्णक्षमतेने पाणी उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्याची पातळी ४५३ मीटरपर्यंत पोहोचली आहे. वेळेत पाऊस झाला नाही तरीदेखील पुढील ९० दिवसांपर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. - अविक बिस्वास, मुख्य जनसंपर्क अधिकारी, वॉटर युटिलिटी कंपनीपाणीपातळी रोज २ दलघमीने खालावतेयसध्या जायकवाडीतील पाणी पातळी रोज दोन दलघमीने खाली जात आहे. मृतसाठ्यातून अजून १६० दलघमी पाणी उपसा करणे शक्य आहे. रोजचा वापर, गाळाचे प्रमाण याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणी सहज पुरेल. - जे. एन. हिरे, उपअभियंता, कडा