शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

मृतसाठ्यातून २१८ दलघमीचा उपसा

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून आतापर्यंत २१८ दलघमीचा उपसा करण्यात आला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्यातून आतापर्यंत २१८ दलघमीचा उपसा करण्यात आला आहे. मृतसाठ्यातून अजूनही १६० दलघमी पाणी उपसा करणे शक्य आहे. उद्योग आणि पिण्याची रोजची गरज आणि बाष्पीभवनाचे प्रमाण पाहता जुलैअखेरपर्यंत हे पाणी सहज पुरू शकेल इतके आहे. वेळेत पाऊस न झाल्यास जुलैअखेर मात्र पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली आहे.जायकवाडी धरणावर औरंगाबाद आणि जालना शहरांसह लहान-मोठ्या जवळपास २५० गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. याशिवाय औरंगाबाद आणि जालना येथील उद्योगांसाठीही या धरणातून पाणीपुरवठा होतो. या सर्वांसाठी जायकवाडी धरणातून रोज ०.२७ दलघमी इतके पाणी उचलले जाते, तर बाष्पीभवनामुळे धरणातील जवळपास १ दलघमी पाणी रोज वाफेच्या स्वरूपात हवेत उडून जाते. जायकवाडी धरणातील जिवंत साठा यंदा २८ मार्च रोजीच संपला. तेव्हापासून उद्योग आणि शहरांसाठी मृतसाठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. परभणी, बीड आणि जालना जिल्ह्यांतील काही गावांसाठीही मृतसाठ्यातूनच खाली पिण्याकरिता पाणी सोडण्यात आले. आतापर्यंत धरणाच्या मृतसाठ्यातून तब्बल २१८ दलघमी इतका पाण्याचा वापर झाला आहे. जायकवाडी धरणाच्या मृतसाठ्याची क्षमता ७३८ दलघमी इतकी आहे. त्यादृष्टीने धरणात अजूनही ५१९ दलघमी इतके पाणी शिल्लक आहे. मात्र, गाळाच्या प्रमाणाचा विचार करता हा साठा ४०० दलघमीच्याच जवळपास आहे. औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी मृतसाठ्यातून कॅनॉलच्या पातळीपर्यंतच पाणी उपसा करणे शक्य आहे. म्हणजे मृतसाठ्यातून जास्तीत जास्त ३८५ दलघमीपर्यंतच पाणी उचलणे शक्य होणार आहे. आतापर्यंत त्यातील २१८ दलघमी पाणी उचलले गेले आहे. त्यामुळे आता १६० दलघमीइतकेच पाणी उचलता येणार आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरेल. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असा दावा कडाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आणखी तीन महिने अडचण नाहीजायकवाडीच्या मृतसाठ्यातून पूर्णक्षमतेने पाणी उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली आहे. सध्या जायकवाडीतील मृतसाठ्याची पातळी ४५३ मीटरपर्यंत पोहोचली आहे. वेळेत पाऊस झाला नाही तरीदेखील पुढील ९० दिवसांपर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. - अविक बिस्वास, मुख्य जनसंपर्क अधिकारी, वॉटर युटिलिटी कंपनीपाणीपातळी रोज २ दलघमीने खालावतेयसध्या जायकवाडीतील पाणी पातळी रोज दोन दलघमीने खाली जात आहे. मृतसाठ्यातून अजून १६० दलघमी पाणी उपसा करणे शक्य आहे. रोजचा वापर, गाळाचे प्रमाण याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणी सहज पुरेल. - जे. एन. हिरे, उपअभियंता, कडा