शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

भूमिगत गटारीसाठी २१६ कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: May 26, 2014 00:23 IST

बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 बीड:शहरात भूमिगत गटार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने २१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तीन वर्षांत भूमिगत गटारीचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी रविवारी पत्रकारपरिषदेत दिली. शहरातील भूमिगत गटारीच्या कामाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून होता; परंतु शहरातील पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्यावे लागले. बीड पालिकेने केंद्राच्या शहरी विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर स्वत: नगरविकासमंत्री कमलनाथ यांना बोलले. त्यानंतर बीड पालिकेसाठी भरीव निधीची तरतूद झाली, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. पालिका , राज्य सरकार दहा टक्के खर्च करणार आहे तर केंद्र सरकार ८० टक्के निधी अनुदान स्वरुपात देणार आहे. राज्यातील सहा पालिकांना हा निधी मिळाला असून त्यात बीडचा समावेश आहे. जायकवाडीतील पाणी उपलब्ध केल्याने भूमिगत गटारीच्या कामास मंजुरी मिळू शकली. हे काम दर्जेदार करण्यात येणार असून गटारीचे पाणी शेतीसाठी वापरात आणण्यात येणार आहे. शिवाय इतर कामांसाठीही त्याचा पुर्नवापर करता येऊ शकतो का? हे देखील पाहिले जाणार असल्याचे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले. भूमिगत गटारीमुळे मलेरिया व साथरोग प्रतिबंधक कार्यक्रमावर होणारा खर्च वाचणार आहे. शिवाय सफाई कामगारही कमी लागतील. शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने भूमिगत गटारी अतिशय महत्त्वाच्या होत्या. हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान आहे, असे ते म्हणाले. हद्दवाडीपासून सुरुवात भूमिगत गटारीच्या कामांना हद्दवाढीच्या भागांपासून होईल. एकूण २१६ किमी अंतरापर्यंत भूमिगत गटार तयार केले जाणार आहे. शहरातील नाल्या, रस्ते यामुळे या कामात अडचणी येऊ नयेत म्हणून हद्दवाढीच्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गटारीचे पाणी साठविण्यासाठी शहराबाहेर कॅनॉल उभारण्यात येणार आहेत. चार झोनमध्ये काम भूमिगत गटारीचे काम चार झोनमध्ये होणार आहे. एबीसीडी अशी नावे देऊन शहरातील चारही बाजूने काम करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी) भाजीमंडईचे काम प्रगतीपथावर शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट ग्राहकांना मिळाला पाहिजे, यासाठी वातानुकुलित भाजीमंडई सिद्धीविनायक कॉम्पलेक्स परिसरात उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.