शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

लॉकडाऊन काळातील २,१४८ गुन्हे होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी २१ मार्च ते जूनअखेरपर्यंत देशभर लॉकडाऊन होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी २१ मार्च ते जूनअखेरपर्यंत देशभर लॉकडाऊन होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास सुरू ठेवण्याची मुभा होती. विनापरवानगी घराबाहेर पडणे, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवणे, विनापरवानगी कार, दुचाकीने प्रवास करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, विनामास्क घराबाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे कलम १८८ नुसार गुन्हा ठरविण्यात आले होते. मार्च ते डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल हजारो नागरिकांवर २ हजार १४८ गुन्हे नोंदविले होते. या गुन्ह्यांतील आरोपी नागरिकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी दिली होती. गुन्हे दाखल होताच पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र तयार केले होते. लॉकडाऊन कालावधीत न्यायालये बंद होती, यामुळे पोलिसांना हे दोषारोपपत्र न्यायालयात तातडीने दाखल करता आले नव्हते.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या गुन्हे नोंद झालेल्या नागरिकांना कोर्टात बोलावून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून आणखी जेरीस आणणे योग्य नसल्याचे शासनाचे मत बनले. यामुळे शासनाने लॉकडाऊन कालावधीत राज्यातील दाखल ४ लाख गुन्हे परत घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहर पोलिसांनी नोंदविलेल्या २ हजार १४८ गुन्ह्यांचा समावेश आहे. हे गुन्हे आता रद्द होणार असल्यामुळे अशा गुन्ह्यांतील आरोपींना दिलासा मिळाला.