शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील २,१४८ गुन्हे होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी २१ मार्च ते जूनअखेरपर्यंत देशभर लॉकडाऊन होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी २१ मार्च ते जूनअखेरपर्यंत देशभर लॉकडाऊन होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास सुरू ठेवण्याची मुभा होती. विनापरवानगी घराबाहेर पडणे, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवणे, विनापरवानगी कार, दुचाकीने प्रवास करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, विनामास्क घराबाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे कलम १८८ नुसार गुन्हा ठरविण्यात आले होते. मार्च ते डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल हजारो नागरिकांवर २ हजार १४८ गुन्हे नोंदविले होते. या गुन्ह्यांतील आरोपी नागरिकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी दिली होती. गुन्हे दाखल होताच पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र तयार केले होते. लॉकडाऊन कालावधीत न्यायालये बंद होती, यामुळे पोलिसांना हे दोषारोपपत्र न्यायालयात तातडीने दाखल करता आले नव्हते.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या गुन्हे नोंद झालेल्या नागरिकांना कोर्टात बोलावून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून आणखी जेरीस आणणे योग्य नसल्याचे शासनाचे मत बनले. यामुळे शासनाने लॉकडाऊन कालावधीत राज्यातील दाखल ४ लाख गुन्हे परत घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहर पोलिसांनी नोंदविलेल्या २ हजार १४८ गुन्ह्यांचा समावेश आहे. हे गुन्हे आता रद्द होणार असल्यामुळे अशा गुन्ह्यांतील आरोपींना दिलासा मिळाला.