शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

२१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:54 IST

लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. दोन वर्षांपासून मात्र लाचखोरांविरोधात एसीबीकडे तक्रारी येण्याचे राज्यातील प्रमाण सरासरी १२ टक्के कमी झाल्याचे समोर आले. मात्र, वर्षभरात एसीबीने २१ कोटी ५९ लाख ५ हजार ४४० रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला.१० डिसेंबर हा जागतिक अ‍ॅन्टी करप्शन दिन म्हणून पाळला जातो. लाचखोरांविरोधात जास्तीत जास्त तक्रारी प्राप्त व्हाव्यात यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जनजागरण करीत असतात. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाचे फोन नंबर आणि आवाहन असलेला फलक लावलेला असतो, असे असूनही दोन वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाºया तक्रारींची संख्या घटल्याचे समोर आले.तक्रारदारच न आल्याने पोलिसांना लाचखोरांविरोधात कारवाई करणे शक्य होत नाही.२०१५ मध्ये १२३४ सापळे रचण्यात आले होते, तर गतवर्षी २०१६ मध्ये ९८५ सापळे लावून लाचखोरांना एसीबीने पकडले, तर यावर्षी जानेवारीपासून कालपर्यंत केवळ ८११ सापळे रचून लोकसेवकांना जेरबंद करण्यात आले.विशेष म्हणजे यात औरंगाबाद विभागातील यावर्षीचा सापळ्यांचा आकडा केवळ १२१ आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी प्राप्त होणाºया तक्रारींची चौकशी करून एसीबीकडून संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येतात. तीन वर्षांत अशा प्रकरणांतही कमालीची घट झाली. २०१५ मध्ये ३५ तर २०१६ साली १७ आणि यावर्र्षी आतापर्यंत २० प्रक रणांत गुन्हे नोंदविण्यात आले. ही आकडेवारी राज्यभरातील आहे. यात औरंगाबाद विभागातील दोन प्रकरणांचा समावेश आहे.१ हजार ६७ लाचखोर पकडलेएसीबीच्या संकेत स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील घटलेल्या सापळ्यांचे सरासरी प्रमाण १२ टक्के आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ८११ सापळ्यात १ हजार ६७ लोकसेवकांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. गतवर्षी पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या १ हजार १७१ होती.महसूल विभाग अव्वललाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल आहे. यावर्षी महसूलचे १९६ अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. यानंतर दुसार क्रमांक पोलीस खात्याचा आहे. पोलीस विभागाच्या १५७ कर्मचाºयांवर एसीबीने कारवाई केली, तर तिसºया क्रमांकासाठी पंचायत समितीचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ८८ कर्मचाºयांना तर मनपाच्या ६२ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.