शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

२१ कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:54 IST

लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लाच देणे आणि घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे लाच देणाºयासोबतच घेणाºयाविरोधातही अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल करता येते, असे असले तरी लाच देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. दोन वर्षांपासून मात्र लाचखोरांविरोधात एसीबीकडे तक्रारी येण्याचे राज्यातील प्रमाण सरासरी १२ टक्के कमी झाल्याचे समोर आले. मात्र, वर्षभरात एसीबीने २१ कोटी ५९ लाख ५ हजार ४४० रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला.१० डिसेंबर हा जागतिक अ‍ॅन्टी करप्शन दिन म्हणून पाळला जातो. लाचखोरांविरोधात जास्तीत जास्त तक्रारी प्राप्त व्हाव्यात यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जनजागरण करीत असतात. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी लाचलुचपत प्र्रतिबंधक विभागाचे फोन नंबर आणि आवाहन असलेला फलक लावलेला असतो, असे असूनही दोन वर्षांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाºया तक्रारींची संख्या घटल्याचे समोर आले.तक्रारदारच न आल्याने पोलिसांना लाचखोरांविरोधात कारवाई करणे शक्य होत नाही.२०१५ मध्ये १२३४ सापळे रचण्यात आले होते, तर गतवर्षी २०१६ मध्ये ९८५ सापळे लावून लाचखोरांना एसीबीने पकडले, तर यावर्षी जानेवारीपासून कालपर्यंत केवळ ८११ सापळे रचून लोकसेवकांना जेरबंद करण्यात आले.विशेष म्हणजे यात औरंगाबाद विभागातील यावर्षीचा सापळ्यांचा आकडा केवळ १२१ आहे. पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी प्राप्त होणाºया तक्रारींची चौकशी करून एसीबीकडून संबंधितांविरोधात गुन्हे नोंदविण्यात येतात. तीन वर्षांत अशा प्रकरणांतही कमालीची घट झाली. २०१५ मध्ये ३५ तर २०१६ साली १७ आणि यावर्र्षी आतापर्यंत २० प्रक रणांत गुन्हे नोंदविण्यात आले. ही आकडेवारी राज्यभरातील आहे. यात औरंगाबाद विभागातील दोन प्रकरणांचा समावेश आहे.१ हजार ६७ लाचखोर पकडलेएसीबीच्या संकेत स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील घटलेल्या सापळ्यांचे सरासरी प्रमाण १२ टक्के आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ८११ सापळ्यात १ हजार ६७ लोकसेवकांना लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. गतवर्षी पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या १ हजार १७१ होती.महसूल विभाग अव्वललाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल विभाग अव्वल आहे. यावर्षी महसूलचे १९६ अधिकारी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. यानंतर दुसार क्रमांक पोलीस खात्याचा आहे. पोलीस विभागाच्या १५७ कर्मचाºयांवर एसीबीने कारवाई केली, तर तिसºया क्रमांकासाठी पंचायत समितीचा समावेश आहे. पंचायत समितीच्या ८८ कर्मचाºयांना तर मनपाच्या ६२ जणांना लाच घेताना पकडण्यात आले.