शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

२१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. कळंब उपविभागातील २१ शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच एकरकमी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरून योजनेचा लाभ घेतला आहे. वर्षोगणती नियमितपणे वीजबिले न भरल्यामुळे लातूर परिमंडलात कृषिपंपाची थकबाकी १५०० कोटीच्या वर पोहोचली आहे. या थकबाकीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व यापुढे नियमितपणे वीजबिले भरण्याची सवय लावण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी २०१४ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील गौर येथील गवळी बंधूनी सर्वप्रथम ५० टक्के रक्कम भरली. त्याबद्दल दहिफळचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत जाधव व तत्कालिन उपकार्यकारी अभियंता एन. आर. खान यांनी गवळी बंधूचा गौरव केल्याने गौर येथील अन्य प्रभू गवळी, वसंत अंधारे, दत्तात्रय देशमुख, रमेश धोंगडे, मुकुंद देशमुख यांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यांचाही महावितरणच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यामुळे परिसरातील मंगरुळ येथील उर्मिला जयंत कुंभार व विठ्ठल सुडके यांनीही एकरकमी ५० टक्के रक्कम भरली. खामसवाडी येथील इंदू रामा सोनवणे, कन्हेरवाडीचे मारुती कवडे, माळकरंजा येथील दिनकर जाधव, परमेश्वर लोमटे तसेच तालुक्यातील बाळासाहेब गायकवाड, बजरंग शिंदे, राजेंद्र कसपटे, किरण आडसूळ, भास्कर आडसूळ, शशीकला भानुदास या शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)अशी आहे कृषी संजीवनी योजनाशासनाच्या कृषी संजीवनी २०१४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील निव्वळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यासाठीही तीन हप्ते पाडून देण्यात आले आहेत. आॅगस्टपर्यंत ५० टक्के एकरकमी भरता येतील. अन्यथा आॅगस्टमध्ये २० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास सप्टेंबरमध्ये २० व आॅक्टोबरमध्ये १० टक्के या प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. दंड व व्याजाची रक्कम महावितरणकडून माफ केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून महावितरणला मिळणार आहे.