शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

२१ शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या कृषी संजीवनी २०१४ योजनेला लातूर परिमंडलात प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. कळंब उपविभागातील २१ शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातच एकरकमी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरून योजनेचा लाभ घेतला आहे. वर्षोगणती नियमितपणे वीजबिले न भरल्यामुळे लातूर परिमंडलात कृषिपंपाची थकबाकी १५०० कोटीच्या वर पोहोचली आहे. या थकबाकीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व यापुढे नियमितपणे वीजबिले भरण्याची सवय लावण्यासाठी महावितरणने कृषी संजीवनी २०१४ योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत कळंब तालुक्यातील गौर येथील गवळी बंधूनी सर्वप्रथम ५० टक्के रक्कम भरली. त्याबद्दल दहिफळचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत जाधव व तत्कालिन उपकार्यकारी अभियंता एन. आर. खान यांनी गवळी बंधूचा गौरव केल्याने गौर येथील अन्य प्रभू गवळी, वसंत अंधारे, दत्तात्रय देशमुख, रमेश धोंगडे, मुकुंद देशमुख यांनीही या योजनेचा लाभ घेतला. त्यांचाही महावितरणच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यामुळे परिसरातील मंगरुळ येथील उर्मिला जयंत कुंभार व विठ्ठल सुडके यांनीही एकरकमी ५० टक्के रक्कम भरली. खामसवाडी येथील इंदू रामा सोनवणे, कन्हेरवाडीचे मारुती कवडे, माळकरंजा येथील दिनकर जाधव, परमेश्वर लोमटे तसेच तालुक्यातील बाळासाहेब गायकवाड, बजरंग शिंदे, राजेंद्र कसपटे, किरण आडसूळ, भास्कर आडसूळ, शशीकला भानुदास या शेतकऱ्यांनीही या योजनेत सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)अशी आहे कृषी संजीवनी योजनाशासनाच्या कृषी संजीवनी २०१४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील निव्वळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यासाठीही तीन हप्ते पाडून देण्यात आले आहेत. आॅगस्टपर्यंत ५० टक्के एकरकमी भरता येतील. अन्यथा आॅगस्टमध्ये २० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास सप्टेंबरमध्ये २० व आॅक्टोबरमध्ये १० टक्के या प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. दंड व व्याजाची रक्कम महावितरणकडून माफ केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी ५० टक्के निव्वळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून महावितरणला मिळणार आहे.