शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरांसाठी केलेले २०११ पूर्वीचे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण होणार अधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:22 IST

२०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी धोरणासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.

औरंगाबाद : २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी धोरणासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जमिनींवर घरांसाठी केलेले अतिक्रमण आता अधिकृत होणार आहे. याबाबत शासनाने अध्यादेश जारी केला असून, यामध्ये अटी व शर्तींचा उल्लेख आहे. त्यामुळे कोणतेही अतिक्रमण अधिकृत होणार नाही. 

महसूल विभाग मालकीच्या अतिक्रमित जागा अतिक्रमणधारकांच्या नावावर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. हे धोरण परिणामकारकरीत्या महापालिका, अ वर्ग नगरपालिका हद्दीतील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागात जिल्हाधिकारी, तर ग्रामीण भागात उपविभागीय अधिकारी याबाबत काम पाहतील.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांसाठी घर या धोरणांतर्गत लाभार्थ्याने अतिक्रमण अधिकृत करण्यासाठी अर्ज केल्यास, अतिक्रमण धारकाला स्वत: १,५०० स्क्वे.फू. जास्त जागेवर केलेले अतिक्रमण काढून टाकावे लागेल. त्यानंतर त्याची १,५०० स्क्वे.फू. जागा अधिकृत होईल. पात्र अतिक्रमणधारकास घरबांधकामास बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी ती जमीन तारण ठेवता येईल. 

या समितीत भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक, मनपा आयुक्त किंवा उपायुक्त, अ वर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असेल. ब आणि क वर्ग नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित जमिनींबाबत निर्णय घेण्यासाठी समितीत भूमिअभिलेख उपअधीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असेल. १ जानेवारी २०११ पूर्वी अतिक्रमण केलेल्या जमिनीपैकी १,५०० स्क्वे.फू. या मर्यादेपर्यंतची जागा अधिकृत करण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागावसर्गीय प्रवर्गातील अतिक्रमणधारकांकडून कुठलेही सरकारी शुल्क घेतले जाणार नाही. इतर प्रवर्गातील अतिक्रमणधारकांना ५०० स्क्वे.फू.पर्यंत शुल्क सूट राहील. ५०० स्क्वे.फू.पेक्षा जास्त व १ हजार चौ.फू.पर्यंत इतर प्रवर्गातील अतिक्रमणधारकांना शुल्क भरावे लागेल. हे शुल्क रेडीरेकनरच्या १० टक्के असेल. १ हजार स्क्वे.फू.पेक्षा जास्त जागेसाठी २५ टक्के शुल्क संबंधिताला भरावे लागेल. 

यापुढे खबरदारी घेण्याचे आदेश यापुढे सरकारी जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागेल. अतिक्रमण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला काळजी घ्यावी लागेल. अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद