शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

घरांसाठी केलेले २०११ पूर्वीचे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण होणार अधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:22 IST

२०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी धोरणासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे.

औरंगाबाद : २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी धोरणासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे जानेवारी २०११ पूर्वी सरकारी जमिनींवर घरांसाठी केलेले अतिक्रमण आता अधिकृत होणार आहे. याबाबत शासनाने अध्यादेश जारी केला असून, यामध्ये अटी व शर्तींचा उल्लेख आहे. त्यामुळे कोणतेही अतिक्रमण अधिकृत होणार नाही. 

महसूल विभाग मालकीच्या अतिक्रमित जागा अतिक्रमणधारकांच्या नावावर करण्याची कार्यवाही करण्यात येईल. हे धोरण परिणामकारकरीत्या महापालिका, अ वर्ग नगरपालिका हद्दीतील सरकारी जमिनींवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागात जिल्हाधिकारी, तर ग्रामीण भागात उपविभागीय अधिकारी याबाबत काम पाहतील.

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांसाठी घर या धोरणांतर्गत लाभार्थ्याने अतिक्रमण अधिकृत करण्यासाठी अर्ज केल्यास, अतिक्रमण धारकाला स्वत: १,५०० स्क्वे.फू. जास्त जागेवर केलेले अतिक्रमण काढून टाकावे लागेल. त्यानंतर त्याची १,५०० स्क्वे.फू. जागा अधिकृत होईल. पात्र अतिक्रमणधारकास घरबांधकामास बँकांकडून कर्ज मिळविण्यासाठी ती जमीन तारण ठेवता येईल. 

या समितीत भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक, मनपा आयुक्त किंवा उपायुक्त, अ वर्ग नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असेल. ब आणि क वर्ग नगरपालिका हद्दीतील अतिक्रमित जमिनींबाबत निर्णय घेण्यासाठी समितीत भूमिअभिलेख उपअधीक्षक, नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचा समावेश असेल. १ जानेवारी २०११ पूर्वी अतिक्रमण केलेल्या जमिनीपैकी १,५०० स्क्वे.फू. या मर्यादेपर्यंतची जागा अधिकृत करण्यात येईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागावसर्गीय प्रवर्गातील अतिक्रमणधारकांकडून कुठलेही सरकारी शुल्क घेतले जाणार नाही. इतर प्रवर्गातील अतिक्रमणधारकांना ५०० स्क्वे.फू.पर्यंत शुल्क सूट राहील. ५०० स्क्वे.फू.पेक्षा जास्त व १ हजार चौ.फू.पर्यंत इतर प्रवर्गातील अतिक्रमणधारकांना शुल्क भरावे लागेल. हे शुल्क रेडीरेकनरच्या १० टक्के असेल. १ हजार स्क्वे.फू.पेक्षा जास्त जागेसाठी २५ टक्के शुल्क संबंधिताला भरावे लागेल. 

यापुढे खबरदारी घेण्याचे आदेश यापुढे सरकारी जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागेल. अतिक्रमण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाला काळजी घ्यावी लागेल. अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचा आदेश शासनाने दिला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद