शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

२०० खाटांचे महिला रुग्णालय; १११ कोटींची निविदा शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहरात शासकीय दूध डेअरीलगत २०० खाटांचे महिला रुग्णालय १११ कोटी रुपयांतून बांधण्यात येणार आहे. जागतिक बँक प्रकल्पातून ...

औरंगाबाद : शहरात शासकीय दूध डेअरीलगत २०० खाटांचे महिला रुग्णालय १११ कोटी रुपयांतून बांधण्यात येणार आहे. जागतिक बँक प्रकल्पातून होणाऱ्या या कामात नवजात शिशू केंद्रासह डॉक्टर आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. ५ मार्च रोजी या कामाची निविदा निश्चित करण्यासाठी जागतिक बँक प्रकल्प (डब्ल्यूबीपी) अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठविली आहे. दोन वर्ष निविदा प्रक्रियेत गेल्यामुळे शासनाने तातडीने मंजुरी दिल्यास कंत्राटदार निश्चित करणे, वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा होईल.

बांधकाम विभागाच्या प्रभारी अधीक्षक अभियंता ज्योती कुलकर्णी, जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता भंडे व इतरांच्या उपस्थितीत सदरील कामाची निविदा उघडली. ३१ मार्चपूर्वी कंत्राटदार निश्चित करून वर्कऑर्डर दिली तर शासनाने यापूर्वी दिलेले ११ कोटींचे पहिल्या टप्प्यातील अनुदान परत जाणार नाही. याच महिन्यात कामाचा नारळ फुटेल.

या रुग्णालयामुळे येणाऱ्या काळात शहराच्या आरोग्यव्यवस्थेत आणखी भर पडणार असून, वैद्यकीय सेवा-सुविधांसाठी विभागात औरंगाबाद अग्रेसर राहणे यामुळे शक्य होणार आहे.

मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. २०१८मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय दूध डेअरीलगत असलेली सरकारी जागा या रुग्णालयासाठी दिली. त्यानंतर १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव फेब्रुवारी २०१९मध्ये शासनाकडे सादर केला. शासनाने १११ कोटी ८९ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे सदरील रुग्णालयाच्या निविदांची प्रक्रिया मागे पडली. लॉकडाऊन शिथिल होत गेल्यानंतर हळूहळू या कामाची निविदांची प्रक्रिया सुरू झाली, दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाला या कामासाठी पहिल्या टप्प्यातील ११ कोटींचे अनुदानदेखील शासनाने दिले. २०० खाटांचे रुग्णालय, नवजात शिशू सुश्रूषा केंद्र आणि वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या ८४ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा हा पूर्ण प्रकल्प आहे.

११ कोटींचे अनुदान परत जाण्याची भीती

मागील सात वर्षांपासून सदरील प्रकल्प रखडला आहे. निविदा प्रक्रियेत दोन वर्ष गेले. आता तातडीने वर्कऑर्डरसाठी बांधकाम विभागाने तयारी केली तर काम लवकर सुरू होणे शक्य आहे. कंत्राटदार निश्चित करून ३१ मार्चपूर्वी कामाला सुरुवात झाली तर ११ कोटींचे अनुदान मिळेल. अन्यथा हे अनुदान शासनाकडे परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, प्र-अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांनी सांगितले, निविदा प्रक्रियेचा निर्णय उच्च समितीला आहे. शासनाने मंजुरी दिल्यानंतर कंत्राटदार, वर्कऑर्डर देण्याचा मार्ग मोकळा होईल.