शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांवर २0 कोटींचा भार

By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST

औरंगाबाद : सरकारने महावितरणला देण्यात येणारे महिन्याचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे शहरातील वीज ग्राहकांना येणारे वीज बिल आता २० टक्के वाढवून येणार आहे.

औरंगाबाद : सरकारने महावितरणला देण्यात येणारे महिन्याचे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे शहरातील वीज ग्राहकांना येणारे वीज बिल आता २० टक्के वाढवून येणार आहे. शहरातील २ लाख ४५ हजार ६२६ वीज ग्राहकांवर २० कोटींचा वीज बिलाचा बोजा पडणार आहे. जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेली १३०७ गावे आहेत, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पैसेवारी असणारी ४६ गावे आहेत. जिल्ह्यात दुष्काळाचा शेतकऱ्यांसह व्यवसाय आणि उद्योगांवर परिणाम झाला आहे. आघाडी सरकारने ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळावी म्हणून महावितरणला महिन्याला ७०६ कोटी रुपये देऊ केलेले अनुदान युती सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखा निर्णय सरकारने घेतल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ५ लाख १७ हजार ग्राहकांवर २० टक्के वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून सरासरी ९५० मेगावॅट वीज लागत आहे. त्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना ३५० दशलक्ष युनिट वीज सरासरी लागत आहे. शहरातील घरगुती, व्यापारी आणि उद्योग वीज ग्राहकांच्या माध्यमातून महिन्याला सरासरी शंभर कोटींचे वीज बिल ग्राहकांकडून वसूल केले जात होते. विजेचे अनुदान बंद करताना शासनाने कृषिपंपांना वगळले. जिल्ह्यातील २ लाख २ हजार ४३६ कृषिपंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.उद्योगांना मोठा शॉक!औरंगाबाद : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वीज दरवाढीचा आर्थिक फटका बसू नये या उद्देशाने तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने सुरू केलेली वीज सबसिडी भाजपा- शिवसेना युती सरकारने बंद करण्याचा खळबळजनक निर्णय गुरुवारी घेतला. त्यामुळे वीज ग्राहकांवर तब्बल २० टक्के दरवाढीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या निर्णयामुळे अगोदरच संकटात असलेल्या उद्योगांना चांगलाच शॉक बसणार आहे.सध्या सुमारे ९ रुपये प्रति युनिट दराने वीज उद्योगांना देण्यात येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत हे दर खूप असल्याची ओरड मागील वर्षीपासून करण्यात येत आहे. सप्टेंबर २०१३ मध्येही उद्योगांसाठी वीज दरात २० टक्के वाढ करण्यात आली होती. आता परत २० टक्के दरवाढ उद्योगांना अजिबात परवडणारी नसल्याचे लघु उद्योजकांचे म्हणणे आहे.