शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

२ हजार प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2017 23:35 IST

जिंतूर : येथील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी निवडीसाठी समितीची बैठक तब्बल ११ महिन्यांपासून झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : येथील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी निवडीसाठी समितीची बैठक तब्बल ११ महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयाकडे प्राप्त झालेले जवळपास २ हजार प्रस्ताव मान्यतेअभावी धूळ खात पडून आहेत.संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजना, विधवा परितक्त्या निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर शासनाच्या वतीने त्यांना दरमहा ६०० रुपये मानधन दिल्या जाते. तालुक्यामध्ये इंदिरा गांधी, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन निराधारांची संख्या जवळपास ४ हजार २६ आहे. तर इंदिरा गांधी विधवा निराधार लाभार्थ्यांची संख्या ५७ असून राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन लाभार्थ्यांची संख्या ७ आहे. संजय गांधी निराधारचे १ हजार ९२३, श्रावणबाळ योजनेतील ४०८ लाभार्थी आहेत. या व्यतीरिक्त तालुक्यातील तब्बल २ हजार लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व इतर कारणामुळे ११ महिन्यांपासून निराधार योजना लाभार्थी निवड समितीची बैठक झालेली नाही. तहसील विभागाकडे आलेले २ हजार प्रस्ताव मान्यतेअभावी पडून आहेत. लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तहसीलदार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांची निवड केली जाते. तहसीलदार पदावर पुर्ण वेळ अधिकारी नसल्याने लाभार्थी निवडीसाठीही उशिर होत असल्याचे बोलले जात होते. एक महिन्यापुर्वी तहसीलदार पदाचा पदभार सुरेश शेजुळ यांनी स्विकारल्यामुळे लाभार्थी निवडीची बैठक तातडीने होईल, असे वाटत होते. परंतु, शेजूळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अद्यापही बैठक झालेली नाही. त्यामुुळे प्रस्ताव दाखल केलेले लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये चकरा मारीत आहेत. शिवाय सध्याच्या लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्याला मानधन मिळत असल्याने त्यांना विविध अडचणीना लाभार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.