शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात १८ हजार मोटारी

By admin | Updated: April 15, 2016 01:52 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या जलाशयातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या जलाशयातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे. जायकवाडी जलाशयाच्या क्षेत्रात औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कृषिपंपांद्वारे पाणी उपसा सुरू आहे. अगदी जलाशयाच्या क्षेत्रात एकेक किलोमीटर चर खोदून ही पाणी चोरी केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी जलसंपदा विभागाने पथके तैनात केलेली आहेत; परंतु त्याचा उपयोग न झाल्यामुळे मध्यंतरी जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीला कृषिपंपाची वायर काढून टाकण्याची विनंती केली होती, तरी शेतकऱ्यांनी पुन्हा या वायर जोडल्यामुळे आता जलसंपदा विभागाने उन्हाळ्याच्या काळात जलाशयाच्या भागातील विद्युत डीपीच काही काळासाठी काढायच्या आणि नंतर पावसाळ्यात त्या पुन्हा बसवायच्या, असा पर्याय शोधला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर अशा दोन्ही भागांतील जलाशयाच्या क्षेत्रावरील डीपी काढून पुन्हा बसविण्याच्या उपायासाठी अनुक्रमे २१ आणि २५ लाख रुपयांचा खर्च येईल, असे कळविले आहे. जायकवाडी धरणाचा काही भाग अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात येतो. सध्याही या भागात सुमारे १८ हजार मोटारींनी अहोरात्र पाणी उपसा सुरू आहे. जलसंपदा विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात कारवाई करून आपल्याकडील भागातील बहुसंख्य मोटारी बंद केल्या आहेत; परंतु अहमदनगर जिल्ह्यातील मोटारी मात्र सुरूच आहेत. म्हणून आता गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्या बाजूच्या मोटारींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.