शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नगर जिल्ह्यात १८ हजार मोटारी

By admin | Updated: April 15, 2016 01:52 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या जलाशयातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या जलाशयातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे ४६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे. जायकवाडी जलाशयाच्या क्षेत्रात औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कृषिपंपांद्वारे पाणी उपसा सुरू आहे. अगदी जलाशयाच्या क्षेत्रात एकेक किलोमीटर चर खोदून ही पाणी चोरी केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी जलसंपदा विभागाने पथके तैनात केलेली आहेत; परंतु त्याचा उपयोग न झाल्यामुळे मध्यंतरी जलसंपदा विभागाने महावितरण कंपनीला कृषिपंपाची वायर काढून टाकण्याची विनंती केली होती, तरी शेतकऱ्यांनी पुन्हा या वायर जोडल्यामुळे आता जलसंपदा विभागाने उन्हाळ्याच्या काळात जलाशयाच्या भागातील विद्युत डीपीच काही काळासाठी काढायच्या आणि नंतर पावसाळ्यात त्या पुन्हा बसवायच्या, असा पर्याय शोधला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर अशा दोन्ही भागांतील जलाशयाच्या क्षेत्रावरील डीपी काढून पुन्हा बसविण्याच्या उपायासाठी अनुक्रमे २१ आणि २५ लाख रुपयांचा खर्च येईल, असे कळविले आहे. जायकवाडी धरणाचा काही भाग अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात येतो. सध्याही या भागात सुमारे १८ हजार मोटारींनी अहोरात्र पाणी उपसा सुरू आहे. जलसंपदा विभागाने औरंगाबाद जिल्ह्यात कारवाई करून आपल्याकडील भागातील बहुसंख्य मोटारी बंद केल्या आहेत; परंतु अहमदनगर जिल्ह्यातील मोटारी मात्र सुरूच आहेत. म्हणून आता गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्या बाजूच्या मोटारींविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली आहे.