शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 09:10 IST

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता.

पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून गुरुवारी रात्री २५ हजार क्युसेक असा विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत असताना दुसरीकडे  जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस  झाला. यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्याने जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. आवक वाढत असल्याने विसर्गात वाढ केल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया रात्री सुरूच होती. धरणाचे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटाने उचलण्यात आले आहेत.

गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धरणाचा जल साठा ९९.२८% होता अचानक एका तासात जलसाठ्याने शंभरी ओलांडल्याने धरणातून विसर्ग १८००० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया सुरू असताना मुळा धरणातून २५ हजाराचा विसर्ग वाढविण्यात आल्याचा संदेश धरण नियंत्रण कक्षात येऊन धडकला. अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे तातडीने धरणावर हजर झाले. धरणातून ७५,४५६ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचे आदेश काळे यांनी दिले. धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड, बंडू आंधारे व तांत्रिक पथकाने धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरू केली रात्री १० वाजेपर्यंत ४०, हजारा पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता,तर रात्री उशिरा तो वाढवून ७५,४५६ करण्यात आला.

मुळाचे पाणी २२ तासात होते दाखल...मुळा धरणातून रात्री आठ वाजेच्या दरम्यान २५ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता.  विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नगर पाटबंधारे विभागाने वर्तविली असल्याने जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. मुळा ते पैठण १०१ किलोमीटर अंतर असून  मुळाचे पाणी जायकवाडी धरणात २२ तासात दाखल होते. परंतु सध्या नदी भरलेली असल्याने १५ तासाच्या आत हे पाणी जायकवाडी धरणात येईल अशी शक्यता बुद्धभूषण दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.

पैठण तालुक्यातील १४ गावांना इशारा

जायकवाडी धरणातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना पैठण तालुक्यातील पैठण कावसान, तेलवाडी चनकवाडी पाटेगाव दादेगाव, वडवाळी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड व हिरडपुरी या गावातील नागरिकांना  सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावरील मालमत्ता गुरे ढोरे दुर घेऊन जावेत असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी