शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 09:10 IST

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता.

पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून गुरुवारी रात्री २५ हजार क्युसेक असा विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत असताना दुसरीकडे  जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस  झाला. यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्याने जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. आवक वाढत असल्याने विसर्गात वाढ केल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया रात्री सुरूच होती. धरणाचे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटाने उचलण्यात आले आहेत.

गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धरणाचा जल साठा ९९.२८% होता अचानक एका तासात जलसाठ्याने शंभरी ओलांडल्याने धरणातून विसर्ग १८००० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया सुरू असताना मुळा धरणातून २५ हजाराचा विसर्ग वाढविण्यात आल्याचा संदेश धरण नियंत्रण कक्षात येऊन धडकला. अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे तातडीने धरणावर हजर झाले. धरणातून ७५,४५६ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचे आदेश काळे यांनी दिले. धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड, बंडू आंधारे व तांत्रिक पथकाने धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरू केली रात्री १० वाजेपर्यंत ४०, हजारा पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता,तर रात्री उशिरा तो वाढवून ७५,४५६ करण्यात आला.

मुळाचे पाणी २२ तासात होते दाखल...मुळा धरणातून रात्री आठ वाजेच्या दरम्यान २५ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता.  विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नगर पाटबंधारे विभागाने वर्तविली असल्याने जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. मुळा ते पैठण १०१ किलोमीटर अंतर असून  मुळाचे पाणी जायकवाडी धरणात २२ तासात दाखल होते. परंतु सध्या नदी भरलेली असल्याने १५ तासाच्या आत हे पाणी जायकवाडी धरणात येईल अशी शक्यता बुद्धभूषण दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.

पैठण तालुक्यातील १४ गावांना इशारा

जायकवाडी धरणातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना पैठण तालुक्यातील पैठण कावसान, तेलवाडी चनकवाडी पाटेगाव दादेगाव, वडवाळी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड व हिरडपुरी या गावातील नागरिकांना  सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावरील मालमत्ता गुरे ढोरे दुर घेऊन जावेत असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी