शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

३९ गावांसाठी १८ कोटींचा आराखडा

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ यात सिंचनाच्या विविध कामांसह प्राचीन जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता दशरथ देवकर यांनी दिली़तालुक्यातील गावे टँकरमुक्त, टंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १६ ते २१ मे या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते़ या माध्यमातून प्रत्येक गावाला भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधून जलस्त्रोतांची माहिती संकलित करण्यात आली़ याद्वारे तालुक्यातील १२३ गावांना भेटी देण्यात आल्या होत्या़ एक अभियंता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, संबंधित गावातील सरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता़ गावातील शिवकालिन, निजामकालीन अशा प्राचीन जलस्त्रोतांची माहिती घेऊन त्यांच्या बळकटीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ तसेच गावाची पाणीपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, पाझर तलावाची पायाभरणी, विहीर पुनर्भरण, समतल चर खोदणे, जमीन सपाटीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, रिचार्ज शाफ्ट घेणे आदी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत़ ही कामे कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाणार आहेत़ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पाणलोट विकास क्षेत्र, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभागाद्वारे निधी उपलब्ध होेणार असून, दिवाळीनंतर उपलब्धतेनुसार व टंचाईच्या तीव्रतेनुसार ही कामे केली जाणार आहेत़ यामुळे संबंधित गावातील टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)