शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

३९ गावांसाठी १८ कोटींचा आराखडा

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ यात सिंचनाच्या विविध कामांसह प्राचीन जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता दशरथ देवकर यांनी दिली़तालुक्यातील गावे टँकरमुक्त, टंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १६ ते २१ मे या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते़ या माध्यमातून प्रत्येक गावाला भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधून जलस्त्रोतांची माहिती संकलित करण्यात आली़ याद्वारे तालुक्यातील १२३ गावांना भेटी देण्यात आल्या होत्या़ एक अभियंता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, संबंधित गावातील सरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता़ गावातील शिवकालिन, निजामकालीन अशा प्राचीन जलस्त्रोतांची माहिती घेऊन त्यांच्या बळकटीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ तसेच गावाची पाणीपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, पाझर तलावाची पायाभरणी, विहीर पुनर्भरण, समतल चर खोदणे, जमीन सपाटीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, रिचार्ज शाफ्ट घेणे आदी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत़ ही कामे कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाणार आहेत़ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पाणलोट विकास क्षेत्र, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभागाद्वारे निधी उपलब्ध होेणार असून, दिवाळीनंतर उपलब्धतेनुसार व टंचाईच्या तीव्रतेनुसार ही कामे केली जाणार आहेत़ यामुळे संबंधित गावातील टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)