शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

३९ गावांसाठी १८ कोटींचा आराखडा

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ यात सिंचनाच्या विविध कामांसह प्राचीन जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता दशरथ देवकर यांनी दिली़तालुक्यातील गावे टँकरमुक्त, टंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १६ ते २१ मे या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते़ या माध्यमातून प्रत्येक गावाला भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधून जलस्त्रोतांची माहिती संकलित करण्यात आली़ याद्वारे तालुक्यातील १२३ गावांना भेटी देण्यात आल्या होत्या़ एक अभियंता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, संबंधित गावातील सरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता़ गावातील शिवकालिन, निजामकालीन अशा प्राचीन जलस्त्रोतांची माहिती घेऊन त्यांच्या बळकटीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ तसेच गावाची पाणीपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, पाझर तलावाची पायाभरणी, विहीर पुनर्भरण, समतल चर खोदणे, जमीन सपाटीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, रिचार्ज शाफ्ट घेणे आदी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत़ ही कामे कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाणार आहेत़ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पाणलोट विकास क्षेत्र, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभागाद्वारे निधी उपलब्ध होेणार असून, दिवाळीनंतर उपलब्धतेनुसार व टंचाईच्या तीव्रतेनुसार ही कामे केली जाणार आहेत़ यामुळे संबंधित गावातील टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)