शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

३९ गावांसाठी १८ कोटींचा आराखडा

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़

उस्मानाबाद : तालुक्यातील १८ गावातील पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १८ कोटी रूपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे़ यात सिंचनाच्या विविध कामांसह प्राचीन जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता दशरथ देवकर यांनी दिली़तालुक्यातील गावे टँकरमुक्त, टंचाईमुक्त करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून १६ ते २१ मे या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते़ या माध्यमातून प्रत्येक गावाला भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधून जलस्त्रोतांची माहिती संकलित करण्यात आली़ याद्वारे तालुक्यातील १२३ गावांना भेटी देण्यात आल्या होत्या़ एक अभियंता, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, संबंधित गावातील सरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता़ गावातील शिवकालिन, निजामकालीन अशा प्राचीन जलस्त्रोतांची माहिती घेऊन त्यांच्या बळकटीच्या आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ तसेच गावाची पाणीपातळी वाढविण्यासाठी सिमेंट बंधारे, पाझर तलावाची पायाभरणी, विहीर पुनर्भरण, समतल चर खोदणे, जमीन सपाटीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, रिचार्ज शाफ्ट घेणे आदी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत़ ही कामे कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाणार आहेत़ मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पाणलोट विकास क्षेत्र, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभागाद्वारे निधी उपलब्ध होेणार असून, दिवाळीनंतर उपलब्धतेनुसार व टंचाईच्या तीव्रतेनुसार ही कामे केली जाणार आहेत़ यामुळे संबंधित गावातील टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)