शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

१७१ शाळांमध्ये प्रवेश शून्य

By admin | Updated: July 1, 2017 00:48 IST

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ३८१ शाळांपैकी आजही तब्बल १७१ शाळांमध्ये एकही प्रवेश झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील ३८१ शाळांपैकी आजही तब्बल १७१ शाळांमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. आतापर्यंत प्रवेशाच्या पाच फेऱ्या झाल्या असून, नोंदणी केलेल्या सर्वच शाळांमध्ये २ हजार ८६० जागा रिक्त राहिल्या आहेत. तथापि, शासकीय पातळीवर कितीही प्रयत्न झाले तरी आरटीई प्रवेशासाठी शाळांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात आरटीई अंतर्गत नोंदणी केलेल्या ३८१ शाळांमध्ये ५ हजार ५१६ जागा प्रवेशासाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. यापैकी २१० शाळांनी २ हजार ६५६ जागांवर विद्यार्थ्यांना पहिलीसाठी प्रवेश दिले आहेत. २५ टक्के जागांसाठी आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील अजूनही २ हजार ८६० जागा रिक्त राहिलेल्या आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शाळा अधिक असल्या तरी शहरामध्येदेखील आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात आलेले नाहीत, याबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी प्रवेशासाठी सहावी फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पालकांना आता उद्यापासून (१ ते ५ जुलैदरम्यान) बुधवारपर्यंत आॅनलाईन नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासंदर्भात पालक व आरटीई प्रवेशासाठी लढा देणाऱ्या संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार आॅनलाइन नोंदणी करतेवेळी घराजवळील शाळा गुगल मॅपवर न दिसणे, घराजवळील शाळांमध्ये रिक्त जागा असूनही लांबच्या शाळांना प्रवेश देणे, पालकांना प्रवेशाबाबतचे संदेश न मिळणे, प्रवेशपत्राची प्रिंट न निघणे, प्रवेश अर्ज केलेल्या शाळांमध्ये रिक्त जागा असूनही सोडतीमध्ये एकाही शाळेसाठी नाव न येणे आदी तांत्रिक त्रुटी आहेत. असे असले तरी या त्रुटींबरोबरच शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाल्यानंतर काही ना काही कारण सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचेच धोरण शाळांकडून राबविले जात आहे. त्यामुळे जागा असूनही प्रवेश दिले जात नाहीत. आरटीई कायद्यानुसार प्रवेश दिला गेला नाही, तर शाळांची मान्यता रद्द करण्यात येते. पण, अनेक शाळा शिक्षण विभागाच्या आदेशाला तसेच कारवाईला जुमानत नाहीत. त्यामुळेच २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त आहेत.