शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

१६६ गावांतील पाणी दूषित

By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून,

उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून, जिल्ह्यातील १६६ गावांचा यामध्ये समावेश आहे़ तर सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यातील २९ गावे यामध्ये आहेत़जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील जलस्त्रोतातील पाण्याच्या नमुन्यांची उस्मानाबाद येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते़ जानेवारी महिन्यात ९२५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते़ यातील २१४ तर फेब्रुवारी महिन्यात ९७१ पैकी ९७१ नमुने दूषित आढळून आले आहेत़ यात उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांचा समावेश आहे़ यामध्ये कावळेवाडी, गोरेवाडी, कोलेगाव, खामगाव, खेड, सारोळा, घोगरेवाडी, कोळेकरवाडी, तेर, दाऊतपूर, भंडारवाडी, रामवाडी, केशेगाव कारखाना, खामसवाडी, टाकळी (ढो़), नितळी, आनंदवाडी, महाळंगी, चिखली, करजखेडा, वडाळा, बरमगाव, कामेगाव, सांगवी, लासोना पाटी, येडशी, उपळा, शिंगोली तांडा आळणी आदी गावांचा समावेश आहे़ भूम तालुक्यातील २५ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यात आंतरवली, ईट, देवळाली, आरसोली, गोरमाळा, बावी आदी गावांचा समावेश आहे़ कळंब तालुक्यातील दहिफळ, सापनाई, हावरगाव, देवधानोरा, देवळाली, मोहा, मस्सा खुर्द, खामसवाडी आदी २६ गावांचा समावेश आहे़ लोहारा तालुक्यातील आष्टाकासार, आष्टामोड, भोसगा, भातागळी, बेळंब, केसरजवळगा, आदी ११ गावांचा समावेश आहे़ उमरगा तालुक्यातील बेळंब, तुरोरी, मुळज, दगडधानोरा,नाईचाकूर, कोळेवाडी, बाभळसूर आदी १८ गावांचा समावेश आहे़ परंडा तालुक्यातील नालगाव, पाचपिंपळा, मलकापूर, जवळा, टाकळी आदी १२ गावांचा, तुळजापूर तालुक्यातील काटगाव, यमगरवाडी, तिर्थ बु़, चिंचोली, रायखेल, सिंदफळ, शिराढोण, बारूळ, होनाळा, खंडाळा आदी २४ गावांचा समावेश आहे़ तर वाशी तालुक्यातील सारोळा, पारा, बावी, लाखनगाव, तेरखेडा, खानापूर आदी ११ गावांचा यामध्ये समावेश आहे़ एकीकडे ‘स्वाईन फ्लू’मुळे हैराण असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना या दूषित पाण्यामुळे विविध आजार जडत आहेत़ तर जिल्हा रूग्णालयात दररोज १००० ते ११०० रूग्ण उपचारासाठी येत आहेत़ पाण्यामुळे जडणाऱ्या आजाराचा यात समावेश आहे़ तरी संबंधित ग्रामपंचायतींनी गावातील जलस्त्रोतातील पाणी स्वच्छ व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)