शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

१६६ गावांतील पाणी दूषित

By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून,

उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून, जिल्ह्यातील १६६ गावांचा यामध्ये समावेश आहे़ तर सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यातील २९ गावे यामध्ये आहेत़जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील जलस्त्रोतातील पाण्याच्या नमुन्यांची उस्मानाबाद येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते़ जानेवारी महिन्यात ९२५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते़ यातील २१४ तर फेब्रुवारी महिन्यात ९७१ पैकी ९७१ नमुने दूषित आढळून आले आहेत़ यात उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांचा समावेश आहे़ यामध्ये कावळेवाडी, गोरेवाडी, कोलेगाव, खामगाव, खेड, सारोळा, घोगरेवाडी, कोळेकरवाडी, तेर, दाऊतपूर, भंडारवाडी, रामवाडी, केशेगाव कारखाना, खामसवाडी, टाकळी (ढो़), नितळी, आनंदवाडी, महाळंगी, चिखली, करजखेडा, वडाळा, बरमगाव, कामेगाव, सांगवी, लासोना पाटी, येडशी, उपळा, शिंगोली तांडा आळणी आदी गावांचा समावेश आहे़ भूम तालुक्यातील २५ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यात आंतरवली, ईट, देवळाली, आरसोली, गोरमाळा, बावी आदी गावांचा समावेश आहे़ कळंब तालुक्यातील दहिफळ, सापनाई, हावरगाव, देवधानोरा, देवळाली, मोहा, मस्सा खुर्द, खामसवाडी आदी २६ गावांचा समावेश आहे़ लोहारा तालुक्यातील आष्टाकासार, आष्टामोड, भोसगा, भातागळी, बेळंब, केसरजवळगा, आदी ११ गावांचा समावेश आहे़ उमरगा तालुक्यातील बेळंब, तुरोरी, मुळज, दगडधानोरा,नाईचाकूर, कोळेवाडी, बाभळसूर आदी १८ गावांचा समावेश आहे़ परंडा तालुक्यातील नालगाव, पाचपिंपळा, मलकापूर, जवळा, टाकळी आदी १२ गावांचा, तुळजापूर तालुक्यातील काटगाव, यमगरवाडी, तिर्थ बु़, चिंचोली, रायखेल, सिंदफळ, शिराढोण, बारूळ, होनाळा, खंडाळा आदी २४ गावांचा समावेश आहे़ तर वाशी तालुक्यातील सारोळा, पारा, बावी, लाखनगाव, तेरखेडा, खानापूर आदी ११ गावांचा यामध्ये समावेश आहे़ एकीकडे ‘स्वाईन फ्लू’मुळे हैराण असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना या दूषित पाण्यामुळे विविध आजार जडत आहेत़ तर जिल्हा रूग्णालयात दररोज १००० ते ११०० रूग्ण उपचारासाठी येत आहेत़ पाण्यामुळे जडणाऱ्या आजाराचा यात समावेश आहे़ तरी संबंधित ग्रामपंचायतींनी गावातील जलस्त्रोतातील पाणी स्वच्छ व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)