शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

१६६ गावांतील पाणी दूषित

By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून,

उस्मानाबाद : येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील ९७१ ठिकाणचे पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील तब्बल २१२ पाणी नमुने दूषित आढळले असून, जिल्ह्यातील १६६ गावांचा यामध्ये समावेश आहे़ तर सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यातील २९ गावे यामध्ये आहेत़जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील जलस्त्रोतातील पाण्याच्या नमुन्यांची उस्मानाबाद येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येते़ जानेवारी महिन्यात ९२५ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते़ यातील २१४ तर फेब्रुवारी महिन्यात ९७१ पैकी ९७१ नमुने दूषित आढळून आले आहेत़ यात उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक २९ गावांचा समावेश आहे़ यामध्ये कावळेवाडी, गोरेवाडी, कोलेगाव, खामगाव, खेड, सारोळा, घोगरेवाडी, कोळेकरवाडी, तेर, दाऊतपूर, भंडारवाडी, रामवाडी, केशेगाव कारखाना, खामसवाडी, टाकळी (ढो़), नितळी, आनंदवाडी, महाळंगी, चिखली, करजखेडा, वडाळा, बरमगाव, कामेगाव, सांगवी, लासोना पाटी, येडशी, उपळा, शिंगोली तांडा आळणी आदी गावांचा समावेश आहे़ भूम तालुक्यातील २५ गावातील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यात आंतरवली, ईट, देवळाली, आरसोली, गोरमाळा, बावी आदी गावांचा समावेश आहे़ कळंब तालुक्यातील दहिफळ, सापनाई, हावरगाव, देवधानोरा, देवळाली, मोहा, मस्सा खुर्द, खामसवाडी आदी २६ गावांचा समावेश आहे़ लोहारा तालुक्यातील आष्टाकासार, आष्टामोड, भोसगा, भातागळी, बेळंब, केसरजवळगा, आदी ११ गावांचा समावेश आहे़ उमरगा तालुक्यातील बेळंब, तुरोरी, मुळज, दगडधानोरा,नाईचाकूर, कोळेवाडी, बाभळसूर आदी १८ गावांचा समावेश आहे़ परंडा तालुक्यातील नालगाव, पाचपिंपळा, मलकापूर, जवळा, टाकळी आदी १२ गावांचा, तुळजापूर तालुक्यातील काटगाव, यमगरवाडी, तिर्थ बु़, चिंचोली, रायखेल, सिंदफळ, शिराढोण, बारूळ, होनाळा, खंडाळा आदी २४ गावांचा समावेश आहे़ तर वाशी तालुक्यातील सारोळा, पारा, बावी, लाखनगाव, तेरखेडा, खानापूर आदी ११ गावांचा यामध्ये समावेश आहे़ एकीकडे ‘स्वाईन फ्लू’मुळे हैराण असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना या दूषित पाण्यामुळे विविध आजार जडत आहेत़ तर जिल्हा रूग्णालयात दररोज १००० ते ११०० रूग्ण उपचारासाठी येत आहेत़ पाण्यामुळे जडणाऱ्या आजाराचा यात समावेश आहे़ तरी संबंधित ग्रामपंचायतींनी गावातील जलस्त्रोतातील पाणी स्वच्छ व्हावे, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)