शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

१६५ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:46 IST

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. ...

ठळक मुद्देगो एअरचे पाटणा-मुंबई विमान : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, एसीही पडला बंद, चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. त्यात विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला आणि १६५ प्रवासी बालंबाल बचावले.गो एअरच्या पाटणा- मुंबई विमानाने रविवारी नेहमीप्रमाणे उड्डाण घेतले. या विमानाने १६५ प्रवासी मुंबईला जात होते. पाटण्याहून टेकआॅफ झाल्यानंतर काहीतरी घडेल, अशी कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. प्रवासाच्या अर्ध्या मार्गात विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. अशा परिस्थितीत विमानातील एसीही बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला. विमानातील प्रत्येक प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला होता. अशा सगळ्या परिस्थितीत वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. पाटणा-मुंबई हवाई मार्गात औरंगाबाद आहे. त्यामुळे या विमानाचे औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंग क रण्याचा निर्णय घेण्यात आला.चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला गो एअरचे पाटणा- मुंबई विमानाचे आपत्कालीन लँडिंग होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विमानतळ प्राधिक रणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली होती. वैमानिकाने सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर उतरविले आणि विमानतळावरील प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते. बºयाच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानतळावरील सुरक्षा हॉलमध्ये प्रवाशांना थांबविण्यात आले.दोन्ही इंजिनांची गती मंदावलीगो एअरच्या पाटणा-मुंबई विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावल्याने विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विमानाचे लँडिंग सुरक्षितरीत्या झाले, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.प्रवाशांना उलट्याविमानातील एसी बंद पडल्यामुळे दोन ते तीन प्रवाशांना उटल्या झाल्या. कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी विमानतळावरच होते. गो एअरचे पथक औरंगाबादला येऊन विमान दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच अन्य विमान बोलावून प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमान