शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

१६४ गावांचा कारभार झीरो तलाठ्यांच्या हाती

By admin | Updated: May 29, 2014 01:12 IST

विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्‍या १६४ गावांचा कारभार वार्‍यावर आहे.

 विजय गायकवाड, वैजापूर वैजापूर तालुक्यातील तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने १० मंडळांतर्गत ५९ तलाठी सजा कार्यालयांतर्गत येणार्‍या १६४ गावांचा कारभार वार्‍यावर असून येथील सजा झीरो तलाठी सांभाळत आहेत. तालुक्यातील ‘अप्पा मंडळी’ घरभाडे वसूल करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. वैजापूर शहराचा अपवाद वगळता तालुक्यात मुख्यालयी एकही तलाठी राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागाचा कारभार असाच रामभरोसे सुरू आहे. तलाठ्यांना मूळ वेतन व गे्रडपेच्या एकूण १० टक्के घरभाडे भत्ता मिळतो; परंतु शासनाकडून घरभाडे भत्ता वसूल केला जातो; मात्र मुख्यालयी राहण्याच्या नावाने सर्वांचीच बोंबाबोब आहे. तालुक्यात वैजापूर,वैजापूर ग्रामीण, नांदगाव, घायगाव, सुराळा, खंडाळा, कोल्ही, जानेफळ, आघूर, जरूळ, शिऊर, बळहेगाव, रघुनाथपूरवाडी, मनेगाव, गारज, मनूर, मांडकी, पोखरी, लासूरगाव, जळगाव, दहेगाव, पालखेड, भगूर, करंजगाव, महालगाव, डवाळा, सिरसगाव, चोरवाघलगाव, गाढेपिंपळगाव, जांबरगाव, लाडगाव, विरगाव, सावखेडगंगा, पुरणगाव, बाबतारा, भऊर, नागमठाण, डाकपिंपळगाव, बाजाठाण, हमरापूर, जातेगाव, वांजरगाव, लोणी खुर्द, वाकला, तलवाडा, अंचलगाव, खरज, पारळा, बोरसर, परसोडा, नालेगाव, भिवगाव, धोंदलगाव व शिवराई, बिलोणी अशी एकूण ५९ तलाठी सजा कार्यालये आहेत. आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात हजेरी संबंधित तलाठी मंडळी फक्त आठवडी बाजाराच्या दिवशीच गावात हजेरी लावतात. त्यामुळे आठवड्यातील अन्य दिवशी काम पडल्यास ग्रामस्थांना या तलाठ्यांना शोधत बसण्याची वेळ येते किंवा आठवडाभर त्याची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. तालुक्यातील जवळपास सर्वच तलाठी हे जिल्हा अथवा तालुक्याच्या ठिकाणी राहून ये-जा करतात. तलाठी मुख्यालयी राहत नसल्याने जात, रहिवासी व उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणावर अडचणी येतात. आता जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे लागणार्‍या विविध प्रमाणपत्रांसाठी तलाठ्यांकडून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची आवश्यकता असते. परंतु तलाठी महाशय गावात राहतच नसल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. झीरो तलाठ्यांवर वचक नसल्याने अनागोंदी दरम्यान, तालुक्याच्या ग्रामीण भागात एकही तलाठी राहत नसल्याने या गावांचा कारभार ‘झीरो’ तलाठ्यांच्या भरवशावर सुरू आहे. जवळपास सर्वच अप्पा मंडळींकडे झीरो तलाठी असल्याने ते गावाकडे फारसे फिरकत नाही. वैजापूर शहरालगतची जी गावे आहेत, त्या सर्व गावांचा कारभार वैजापूर शहरातूनच चालतो. त्यांनी शहरातच कार्यालये थाटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी उंबरे झिजवावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून असाच हा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्या या गलथान व ढिसाळ कारभारावर ना लोकप्रतिनिधींचा वचक आहे ना वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांचा.