शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

१६ वर्षांची नवरी, २६ वर्षांचा नवरा अन् लग्नापुर्वीच धडकले दामिनी पथक, उस्मानपुऱ्यात रोखला बालविवाह

By राम शिनगारे | Updated: May 14, 2023 22:04 IST

लग्न न होताच वऱ्हाडी पोटभर जेवण जेऊन गेले.

छत्रपती संभाजीनगर : वडिल सुरक्षारक्षक असून, दारूचे प्रचंड व्यसन आहे. दोन मुलींच्या सांभाळण्याचा भार आईवरच होता. त्यामुळे आईनेच १६ वर्षांच्या मुलीचे लग्न २६ वर्षाच्या मुलासोबत जमवले. या अल्पवयीन मुलीच्या विवाहाची माहिती पोलिसांना कळाली. त्यावरून दामिनी पथकाने घटनास्थळ गाठत नवरा-नवरीच्या आई-वडिलांना समजावून सांगत बालविवाह रोखला. ही घटना उस्मानपुऱ्यातील मिनाताई ठाकरे सभागृहात रविवारी दुपारी घडल्याची माहिती भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी दिली.

भरोसा सेलच्या निरीक्षक तायडे यांना उस्मानपुऱ्यात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे, भरोसाच्या उपनिरीक्षक ज्योती गात यांना सहकाऱ्यांसह खात्री करण्यासाठी पाठविले. दामिनी पथकाने साध्या वेशात घटनास्थळ गाठत लग्न होणार कन्फर्म केले. सभागृहात नवरदेव होता. अडीच वाजेच्या सुमारास नवरी आली. तेव्हा पथकाने नवरीच्या वयाचा पुरावा नातेवाईकांकडे मागितला. तेव्हा नवरीची जन्मतारीख ३० मार्च २००७ निघाली. नवरीला नुकतेच १६ वर्ष पूर्ण झाले होते. नवरा मुलाचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक होते.

दामिनी पथकाने नातेवाईकांना लग्नाचे दुष्परिणाम सांगितले. मुलीचा विवाह केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वांवर गुन्हे दाखल होतील, असे स्पष्ट केले. तेव्हा नातेवाईकांनी चुक झाल्याचे मान्य करीत १८ वर्ष होईपर्यंत मुलीचे लग्न करणार नसल्याचे लेखी लिहुन दिले. घटनेची उस्मानुपरा ठाण्यात नोंद केली. ही कारवाई निरीक्षक अम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिता फासाटे, ज्योती गात, सहायक फौजदार लता जाधव, हवालदार निर्मला निंभोरे, हिरा चिंचोळकर, आकाश नरवडे, चाईल्ड हेल्पलाईनच्या अन्नपूर्णा ढोरे यांनी केली.

...अन् नवरा रडू लागला

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नवरा मुलगा होता. तो पुण्यात सुरक्षारक्षक कंपनी सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे. नवरी अल्पवयीन असल्यामुळे लग्न करता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नवऱ्या मुलालाच रडू कोसळले. तेव्हा त्याचे नातेवाईकांनी सांत्वन केले.

वऱ्हाडी पोटभर जेऊन गेलेसभामंडपात लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. चार स्वयंपाकींनी २०० लोकांचे जेवणही तयार केले हाेते. विवाह होणार नसल्यामुळे सर्व अन्न वाया जाईल. वऱ्हाडी मंडळीही बीड जिल्ह्यातुन आलेली होती. त्यामुळे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वऱ्हाडींना जेऊ घालण्यात आले. लग्न न होताच वऱ्हाडी पोटभर जेवण करून गेले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद