शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

१६ वर्षांची नवरी, २६ वर्षांचा नवरा अन् लग्नापुर्वीच धडकले दामिनी पथक, उस्मानपुऱ्यात रोखला बालविवाह

By राम शिनगारे | Updated: May 14, 2023 22:04 IST

लग्न न होताच वऱ्हाडी पोटभर जेवण जेऊन गेले.

छत्रपती संभाजीनगर : वडिल सुरक्षारक्षक असून, दारूचे प्रचंड व्यसन आहे. दोन मुलींच्या सांभाळण्याचा भार आईवरच होता. त्यामुळे आईनेच १६ वर्षांच्या मुलीचे लग्न २६ वर्षाच्या मुलासोबत जमवले. या अल्पवयीन मुलीच्या विवाहाची माहिती पोलिसांना कळाली. त्यावरून दामिनी पथकाने घटनास्थळ गाठत नवरा-नवरीच्या आई-वडिलांना समजावून सांगत बालविवाह रोखला. ही घटना उस्मानपुऱ्यातील मिनाताई ठाकरे सभागृहात रविवारी दुपारी घडल्याची माहिती भरोसा सेलच्या निरीक्षक अम्रपाली तायडे यांनी दिली.

भरोसा सेलच्या निरीक्षक तायडे यांना उस्मानपुऱ्यात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे, भरोसाच्या उपनिरीक्षक ज्योती गात यांना सहकाऱ्यांसह खात्री करण्यासाठी पाठविले. दामिनी पथकाने साध्या वेशात घटनास्थळ गाठत लग्न होणार कन्फर्म केले. सभागृहात नवरदेव होता. अडीच वाजेच्या सुमारास नवरी आली. तेव्हा पथकाने नवरीच्या वयाचा पुरावा नातेवाईकांकडे मागितला. तेव्हा नवरीची जन्मतारीख ३० मार्च २००७ निघाली. नवरीला नुकतेच १६ वर्ष पूर्ण झाले होते. नवरा मुलाचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक होते.

दामिनी पथकाने नातेवाईकांना लग्नाचे दुष्परिणाम सांगितले. मुलीचा विवाह केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वांवर गुन्हे दाखल होतील, असे स्पष्ट केले. तेव्हा नातेवाईकांनी चुक झाल्याचे मान्य करीत १८ वर्ष होईपर्यंत मुलीचे लग्न करणार नसल्याचे लेखी लिहुन दिले. घटनेची उस्मानुपरा ठाण्यात नोंद केली. ही कारवाई निरीक्षक अम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिता फासाटे, ज्योती गात, सहायक फौजदार लता जाधव, हवालदार निर्मला निंभोरे, हिरा चिंचोळकर, आकाश नरवडे, चाईल्ड हेल्पलाईनच्या अन्नपूर्णा ढोरे यांनी केली.

...अन् नवरा रडू लागला

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नवरा मुलगा होता. तो पुण्यात सुरक्षारक्षक कंपनी सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे. नवरी अल्पवयीन असल्यामुळे लग्न करता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नवऱ्या मुलालाच रडू कोसळले. तेव्हा त्याचे नातेवाईकांनी सांत्वन केले.

वऱ्हाडी पोटभर जेऊन गेलेसभामंडपात लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. चार स्वयंपाकींनी २०० लोकांचे जेवणही तयार केले हाेते. विवाह होणार नसल्यामुळे सर्व अन्न वाया जाईल. वऱ्हाडी मंडळीही बीड जिल्ह्यातुन आलेली होती. त्यामुळे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वऱ्हाडींना जेऊ घालण्यात आले. लग्न न होताच वऱ्हाडी पोटभर जेवण करून गेले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद