शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

समृद्धी महामार्गासाठी १५५ हेक्टर जमिनीचे संपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:29 IST

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्याच्या कामाला वैजापूर तालुक्यात वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ गावांतील १५५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून शेतक-यांना तब्बल १२५ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्याच्या कामाला वैजापूर तालुक्यात वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ गावांतील १५५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून शेतक-यांना तब्बल १२५ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील डवाळा, अगरसायगाव, शिवराई, पालखेड, गोळवाडी, घायगाव, वैजापूर ग्रामीण, करंजगाव, कनकसागज, खंबाळा, सुराळा, हडसपिंपळगांव, दहेगाव, जांबरगाव, लासूरगाव या १५ गावातील जमीन संपादीत करण्यात येणार आहे. या गावातून महामार्गाचा ४३ कि.मी. अंतराचा रस्ता जातो. प्रशासनाने या गावातील जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु केली आहे.शेतकºयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आतापर्यंत १५४.१०८३ हेक्टर क्षेत्रफळाची खरेदी करण्यात आली आहे. शेतक-यांना १२५ कोटी रुपयांचे वाटप देखील करण्यात आले आहे. ११३० लाभार्थी शेतकºयांपैकी २६६ शेतकºयांनी यासाठी आवश्यक संमती दिली आहे.दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा हा मार्ग उन्नतीसाठीही पूरक ठरणार आहे. या महामार्गामुळे पंधराही गावांना उर्जितावस्था येणार आहे. सुरुवातीला या महामार्गाबद्दल असणाºया उलटसुलट चर्चेमुळे व फारशी माहिती उपलब्ध नसल्याने गैरसमजातून अनेकांनी विरोधाची भूमिका घेतली होती. परंतु जमिनीचा योग्य मोबदला व जिल्ह्याच्या दळणवळणासाठी असणारे महत्त्व पाहता हा विरोध आता कमी होत असल्याचे दिसत आहे.कोणत्याही भागाच्या प्रगतीसाठी दळणवळणाची प्रभावी साधने सहायकारी असतात. तालुक्यात लोहमार्गाचे जाळे कमी आहे. त्यामुळे महामार्गातून ती हानी भरण्याची संधी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मिळणार आहे.जिल्हा समितीकडून १५ गावांचे मूल्यांकनसमृद्धी महामार्गातील जमीन संपादित करण्यासाठी यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी समृद्धी महामार्ग यांनाच अधिकार होते. परंतु आता उपविभागीय अधिकारी तथा वैजापूर व गंगापूर तहसीलदारांना तसा अधिकार प्रधान केल्याने कामाची गती वाढली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप आणि तहसीलदार सुमन मोरे यांनी वळोवेळी शेतकºयांशी संवाद साधत येणाºया अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले आहे.या रस्त्यासाठी ४५३ हेक्टरची आवश्यकता आहे. जिल्हा समितीकडून शेतकरीनिहाय मूल्यांकननिश्चिती कामाला वेग देण्यात आला असून १५ गावांचे मूल्यांकन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.शेतकºयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ११३० भूधारकांची संमती मिळाली असून १५ गावांचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले आहे, असे उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी सांगितले.