शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

दोन महिन्यांत जळाले १५५ रोहित्र

By admin | Updated: December 8, 2015 00:10 IST

पैठण : तालुक्यात १ आॅक्टोबरपासून आजपर्यंत १५५ रोहित्र जळाले असून, यापैकी ११० रोहित्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले.

पैठण : तालुक्यात १ आॅक्टोबरपासून आजपर्यंत १५५ रोहित्र जळाले असून, यापैकी ११० रोहित्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले. यापैकी ४ रोहित्र जायकवाडी येथील गाळणी शाखेत दुरूस्त करण्यात आले आहेत. अद्यापही ४२ रोहित्र दुरुस्त होऊन येणे बाकी आहे. पैठण तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांना तातडीने रोहित्र दुरुस्त करून देता यावे, यासाठी महावितरणने जायकवाडी येथे गाळणी शाखा उभारण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी रोहित्राच्या प्राथमिक दुरुस्तीस प्रारंभ करण्यात आला असून, अद्ययावत मशिनरी उपलब्ध होताच रोहित्राची पूर्ण दुरुस्ती येथेच करण्यात येणार असल्याचे सहायक कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड यांनी सांगितले .तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण १८% एवढे आहे. रोहित्र जळाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी औरंगाबाद येथे पाठवावे लागत होते. यात किमान महिनाभराचा कालावधी रोहित्र दुरुस्त होऊन येण्यासाठी लागत असल्याने दरम्यानच्या कालावधीत विजेअभावी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत होते .राज्य शासनाने ज्या तालुक्यात रोहित्र जळण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा तालुक्यात रोहित्र दुरुस्तीसाठी गाळणी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत पैठण येथे ही शाखा उभारण्यात येत असल्याचे अधीक्षक अभियंता फुलकर यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता नामदेव गांधले यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे काम जायकवाडी येथे करण्यात येत आहे. सुमारे पाच लक्ष रुपये खर्च करून येथे शेड कंपाऊंड वॉल प्लॉटफार्म उभारण्यात आला आहे, तर ट्रान्सफॉर्मर गरम करण्यासाठी लागणारे ओव्हनचा मागणी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. हे ओव्हन येताच सर्व रोहित्रांची दुरुस्ती पैठण येथेच करण्यात येईल, असे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले. ही शाखा कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना ताबडतोब रोहित्र दुरुस्त करून देण्याची सोय होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.