शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दीडशे वर्षांची तखतरावची परंपरा दोन वर्षांपासून खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:02 IST

फुलंब्री : शहरासह तालुक्यातील बाबरा येथील पाडवा उत्सवात गेल्या दीडशे वर्षांपासून जोपासली जाणारी तखतराव या सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा गेल्या ...

फुलंब्री : शहरासह तालुक्यातील बाबरा येथील पाडवा उत्सवात गेल्या दीडशे वर्षांपासून जोपासली जाणारी तखतराव या सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडित झालेली आहे.

फुलंब्री तालुक्यातील फुलंब्रीशिवाय बाबरा येथे पाडवा उत्सवात कलगीतुरा गीतावर आपल्या नृत्याचे प्रदर्शन करीत असलेल्या चार लोकांचा समूह म्हणजे तखराव होय. परिसरात गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते. फुलंब्री गावात तीन वेशी आहेत. या वेशीतून तीन पोळे फुटतात. शिवाय पाडव्याला प्रत्येक वेशीतील तखतराव असतात. पूर्वी एका वेशीतून पाच ते सहा तखतराव निघायचे; पण गेल्या काही वर्षांपासून या तखतरावच्या संखेत घट होत आहे. २०१९ मध्ये एका वेशीतून केवळ एक किवा दोन तखतराव निघाले. प्रत्येक वेशीला पंच कमिटी असून, ती कमिटी तखतरावांना आर्थिक मदत करीत असे. आता ही पंच कमिटी अस्तित्वात नसल्यामुळे तखतरावांना लागणारा खर्च करायला कोणी तयार नाही, त्यामुळे दिवसेंदिवस तखतरावांची संख्या कमी होत आहे.

चौकट

पंडित नेहरुंनी १९५७ साली दिली होती भेट

फुलंब्री येथील या पोळ्याची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. १९५७ साली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही खास करून पोळ्याच्या दिवशी येथे भेट दिली होती. तेव्हापासून फुलंब्रीचे नाव देशपातळीवर पोहोचले होते.

चौकट...

तखतराव म्हणजे काय

पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडव्यालाही फुलंब्री परिसरात अधिक महत्त्व आहे. याचे खास आकर्षण म्हणजे बैलगाडीवर लाकडी फळ्या टाकून स्टेज तयार केले जाते. या स्टेजवर कलगीतुऱ्याच्या गीतावर नृत्य करणारी नृत्यांगना असते, तर तिला गायनासाठी चार लोक मदत करतात, त्यांना तखतराव म्हणतात. नृत्याची ही परंपरा दीडशे वर्षांपूर्वीपासून आहे.

सांस्कृतिक परंपरा लोप पावत चालली

फुलंब्री शहरातील या तखतरावची सांस्कृतिक परंपरा गेल्या पंधरा, सोळा वर्षांपासून कमी होत चालली आहे. तत्पूर्वी २५ तखतराव कलाप्रदर्शन करायचे. आता संख्येत घट होऊन ही संख्या केवळ चारवर आली आहे. जुन्या पिढीतील काही लोक ही परंपरा जपून आहेत. पण नवीन पिढी मोबाइलमध्ये मश्गुल राहत असल्याने तखतरावची मिरवणूक निघाल्यानंतरही होणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी राहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर ही परंपराच कोरोनामुळे खंडित झाली आहे.