शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे वर्षांची तखतरावची परंपरा दोन वर्षांपासून खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:02 IST

फुलंब्री : शहरासह तालुक्यातील बाबरा येथील पाडवा उत्सवात गेल्या दीडशे वर्षांपासून जोपासली जाणारी तखतराव या सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा गेल्या ...

फुलंब्री : शहरासह तालुक्यातील बाबरा येथील पाडवा उत्सवात गेल्या दीडशे वर्षांपासून जोपासली जाणारी तखतराव या सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडित झालेली आहे.

फुलंब्री तालुक्यातील फुलंब्रीशिवाय बाबरा येथे पाडवा उत्सवात कलगीतुरा गीतावर आपल्या नृत्याचे प्रदर्शन करीत असलेल्या चार लोकांचा समूह म्हणजे तखराव होय. परिसरात गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते. फुलंब्री गावात तीन वेशी आहेत. या वेशीतून तीन पोळे फुटतात. शिवाय पाडव्याला प्रत्येक वेशीतील तखतराव असतात. पूर्वी एका वेशीतून पाच ते सहा तखतराव निघायचे; पण गेल्या काही वर्षांपासून या तखतरावच्या संखेत घट होत आहे. २०१९ मध्ये एका वेशीतून केवळ एक किवा दोन तखतराव निघाले. प्रत्येक वेशीला पंच कमिटी असून, ती कमिटी तखतरावांना आर्थिक मदत करीत असे. आता ही पंच कमिटी अस्तित्वात नसल्यामुळे तखतरावांना लागणारा खर्च करायला कोणी तयार नाही, त्यामुळे दिवसेंदिवस तखतरावांची संख्या कमी होत आहे.

चौकट

पंडित नेहरुंनी १९५७ साली दिली होती भेट

फुलंब्री येथील या पोळ्याची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. १९५७ साली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही खास करून पोळ्याच्या दिवशी येथे भेट दिली होती. तेव्हापासून फुलंब्रीचे नाव देशपातळीवर पोहोचले होते.

चौकट...

तखतराव म्हणजे काय

पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडव्यालाही फुलंब्री परिसरात अधिक महत्त्व आहे. याचे खास आकर्षण म्हणजे बैलगाडीवर लाकडी फळ्या टाकून स्टेज तयार केले जाते. या स्टेजवर कलगीतुऱ्याच्या गीतावर नृत्य करणारी नृत्यांगना असते, तर तिला गायनासाठी चार लोक मदत करतात, त्यांना तखतराव म्हणतात. नृत्याची ही परंपरा दीडशे वर्षांपूर्वीपासून आहे.

सांस्कृतिक परंपरा लोप पावत चालली

फुलंब्री शहरातील या तखतरावची सांस्कृतिक परंपरा गेल्या पंधरा, सोळा वर्षांपासून कमी होत चालली आहे. तत्पूर्वी २५ तखतराव कलाप्रदर्शन करायचे. आता संख्येत घट होऊन ही संख्या केवळ चारवर आली आहे. जुन्या पिढीतील काही लोक ही परंपरा जपून आहेत. पण नवीन पिढी मोबाइलमध्ये मश्गुल राहत असल्याने तखतरावची मिरवणूक निघाल्यानंतरही होणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी राहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर ही परंपराच कोरोनामुळे खंडित झाली आहे.