शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

५ महिन्यांत १६ लाचखोर जेरबंद

By admin | Updated: June 15, 2014 00:58 IST

उस्मानाबाद : दिवसेंदिवस पोलीस, महसूलसह अन्य विभागातही लाचखोरी बोकाळली आहे.

उस्मानाबाद : दिवसेंदिवस पोलीस, महसूलसह अन्य विभागातही लाचखोरी बोकाळली आहे. उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील पाच महिन्यांमध्ये १६ लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहेत. मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये लाचखोरी बळावली आहे. चिरीमिरी दिल्याशिवाय टेबलावरील फाईल पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी वारंवार होतात. नागरिकांमध्ये हळूहळू जागरुकता येत असल्याने अशा लाचखोरीबाबत थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रारी दाखल केल्या जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून की काय रंगेहाथ पकडलेल्या लाचखोरांचा आकडाही वाढू लागला आहे. १ जानेवारी ते १३ जून २०१४ या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आदी कार्यालयातील मिळून १६ जणांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या बाबतीत विचार केला असता, हा आकडा पाचशेवर जावून ठेपल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आले आहे. या आकड्यावरुन सरकारीबाबूमध्ये लाचखोरी किती भिनली आहे हे लक्षात येते. प्रत्येक महिन्यात जवळपास शंभर केसेस होत आहेत. ही माहिती लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कोणताही शासकीय अधिकारी, कर्र्मचारी अथवा त्यांच्या वतीने एखादा खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.