शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादमध्ये दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात; राज्यासह परराज्यातूनही झाली आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:50 IST

राज्यातून व परराज्यांतून सुमारे दीड कोटी रुपयांच्या राख्या शहरातील बाजारात दाखल झाल्या आहेत.   

औरंगाबाद : भाऊ व बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला राखी पौर्णिमा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. शहरात ठिकठिकाणी स्टॉलमध्ये असलेल्या राख्यांमधून लाडक्या भाऊरायासाठी मनपसंत राखी शोधताना बहिणी दिसून येत आहेत. राज्यातून व परराज्यांतून सुमारे दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.   

शहरात मुंबईहून फॅन्सी राख्या, कोलकाताहून पारंपरिक राख्या, तर अहमदाबादहून स्टोन, मोती, दोऱ्याच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा गुलमंडी, औरंगपुरा, मछलीखडक तसेच शहागंज, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, आविष्कार कॉलनी, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर या भागात असंख्य स्टॉल लागले आहेत. तसेच गल्लीबोळातही किराणा दुकानावर राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. १३ व्यापारी ठोक व्यवसाय करतात, तर शेकडो किरकोळ व्यापारी त्यांच्याकडून राख्या घेऊन ते ग्राहकांना विकतात.

छोट्याछोट्या हातगाड्यावरही असंख्य राख्या लटकविलेल्या दिसून येत आहेत. बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायासाठी शेकडो राख्यांमधून मनपसंत राखी निवडताना दिसून येत आहेत. तेजपाल जैन या होलसेल विक्रेत्यांनी सांगितले की, यंदा दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात आल्या आहेत. यात अवघ्या ६ रुपये डझनपासून ते १८०० रुपये डझनपर्यंतच्या राख्या आहेत. अहमदाबादहून आलेल्या डायमंड स्टोनच्या राखी १५० रुपयांना एक नग मिळत आहे. साधारणत: शहरात २० रुपये ते ५० रुपयांपर्यंतच्या राख्या जास्त प्रमाणात विकल्या जातात. यंदा स्टोन, डायमंड, मोत्यांनी सजविलेल्या राख्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

याशिवाय खास वहिनीसाठी कडा आणि त्यास लटकन असलेल्या राखीला पूर्वी जैन, मारवाडी समाजातून मागणी असो; पण आता उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तसेच मराठी लोकही या राखी खरेदी करताना दिसून येत आहेत. लहान मुलांसाठी कार्टून पात्र असलेली राखी, स्पिनर राखी, म्युझिक राखी खास करून खरेदी केली जात आहे. तसेच घरातील देव-देवतांच्या मूर्ती, वाहन, पेन यांना बांधण्यासाठीही ‘देव’ राखी आवर्जून खरेदी केली जाते. अवघ्या १ रुपये डझनपासून या राखी मिळत आहेत. याशिवाय ‘माय ब्रदर’, ‘आय लव्ह यू भय्या’, असे लिहिलेल्या स्टीलच्या राख्याही नावीन्यपूर्ण ठरत आहेत. 

पुन्हा स्पंजच्या राख्या  २० वर्षांपूर्वी स्पंजच्या राख्यांची क्रेझ होती. मोठ्यात मोठी स्पंजची राखी घालणे प्रतिष्ठेचे समजले जात होते; पण २००० पासून आकाराने लहान-नाजूक राखी खरेदीकडे बहिणींचा ओढा वाढला. आजही अशा राख्या बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. आधुनिकतेच्या ओघात गायब झालेल्या स्पंजच्या राख्या आता पुन्हा अवतरल्या आहेत. 

राखीवर अवतरला भाऊरायाआधुनिक राख्यांमध्ये आता चक्क आपला लाडका भाऊरायाच राखीवर अवतरलेला पाहण्यास मिळत आहे. भावाचा फोटो असलेली राखी सध्या बहिणींची पहिली पसंत ठरत आहे. आपल्या भावाचा फोटो व्हॉटस्अपद्वारे दुकानदाराला दिला जात आहे. त्यावरून दुकानदार राख्यांवर तो फोटो स्कॅनकरून देत आहेत, अशा राख्यांना यंदा चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारRaksha Bandhanरक्षाबंधन