शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१४२ मजुरांचा पत्ताच नाही !

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही.

कळंब : पथकाने ३३३१ जॉबकार्डधारकांचे सर्वेक्षण केल्यानंतर २२६५ जण डिकसळ येथील रहिवासी असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे या पथकाला १४२ मजूरांचा पत्ताच लागलेला नाही. तर जॉबकार्ड धारक असलेले १४३४ जणांना इतरत्र रोजगार उपलब्ध असल्याने त्यांनी कामाची आवश्यकता नसल्याचे मत नोंदविले़ त्यामुळे सदर बोगस मजुरांची नावे कोणी घुसविली असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार डिकसळ (ताक़ळंब) येथील महाग्रारोहयो अंतर्गत नोंदणीकृत मजुरांच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे़ यात नोंदणीकृत मजुरांची संख्या ३३३१ असली तरी प्रत्यक्षात ११३३ मजुरांनी कामाची मागणी केल्याचे समोर आले असून, इतरत्र व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १८९७ असल्याचे समोर आले आहे. या एकूणच प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे़ जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी १८ जून रोजी डिकसळ येथील हनुमान मंदीर ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था या महाग्रारोहयो अंतर्गतच्या रस्ता कामास भेट दिली होती़ त्यावेळी गावात नोंदणीकृत मजुरांची संख्या हजारावर असताना प्रत्यक्ष कामावर कमी उपस्थित असल्याचे जाणवले़ डिकसळ गावातीलच मजुरांना कामाची आवश्यकता आहे का ? स्थलांतर झाले आहे का ? इतरत्र कोठे काम करतात का ? आदी मुद्द्यावर प्रत्यक्ष मजुरांचा जबाब घेऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनास दिल्या होत्या़ प्रशासनाने थेट भेटी देऊन सर्वेक्षण केल्याने खळबळ उडाली आहे. अहवालानंतर समोर येणारी वस्तुस्थिती पाहता प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ १३ कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणतहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले़ पंचायत समिती, तहसील मधील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तीन तलाठी, एक ग्रामसेवक, एक रोजगार सेवक, पंचायत समितीच्या सात तांत्रिक अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. गुरूवारी दुपारपासूनच या पथकाने आपले काम सुरू केले़ एका कर्मचाऱ्याकडे जवळपास २५० ते ३०० लोकांची यादी देण्यात आली होती़ या पथकाने दोन दिवसात डोअर-टू-डोअर फिरून प्रत्यक्ष सर्वेक्षण केले़ नावानुसार घरे व व्यक्ती शोधताना या पथकाची चांगलीच दमछाक झाली़ त्यामुळे आता जिल्हाधिकारी या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)कठोर कारवाईची आवश्यकतादुष्काळी म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे घेण्यात येतात. मात्र याचा लाभ गरजुंना मिळण्याऐवजी अधिकारी, गुत्तेदारांची लॉबी घेत असल्याचे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या विविध घोटाळ्यावरुन स्पष्ट होत आहे. कळंबसह परंडा, वाशी तालुक्यातील रोहयो कामातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आता सर्वसामान्यातून होत आहे.११३३ जणांना कामाची गरजसर्वेक्षणानंतर डिकसळ येथील ११३३ जॉबकार्ड धारकांना रोजगाराची गरज असल्याचे सांगण्यात आले़ गावातील १४३४ जणांनी खासगी किंवा स्वयंरोजगार करणार असल्याचे व यातील इतरत्र नोकरी करत असतानाही मजुराच्या नोंदणी यादीत असल्याचे सूत्रांनी सांगितले़असे आहे गावचे चित्रसर्वेक्षणातील मजूर संख्या :३३३१रहिवासी असलेले :२२६५स्थलांतरित झालेले : ०५६०गावाला ज्ञात नसलेले : १४२मयत झालेले : ६२इतर व्यवसायात असलेले : १४३४मजुरीची आवश्यकता असलेले :११३३