शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना वगळायचे आहे यादीतून नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 11:30 IST

दोन हजार मतदारांना बदलायचा आहे वॉर्ड, मतदारसंघ

औरंगाबाद : जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, तर दोन हजार मतदारांना मतदारसंघ किंवा वॉर्ड बदलून घ्यायचा आहे. ३७ हजार ७५९ नवमतदारांचे अर्ज आले आहेत.

निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, यात दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीस पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या ३७ हजार ७५९ जणांनी अर्ज दाखल केले असून, नावासह अन्य दुरुस्तीसाठी सहा हजारच्या वर मतदारांनी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमावर ५ डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येतील. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तीच अंतिम मतदारयादी २०२२ मध्ये होणाऱ्या महानगरपलिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

नवीन मतदार होण्यासाठी किती जणांचे अर्जनवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक सहा हजार ५५१ अर्ज कन्नडमधून झाले, तर सिल्लोडमधून तीन हजार ५२३, फुलंब्री तीन हजार ६५६, औरंगाबाद मध्यमधून तीन हजार २८२, औरंगाबाद पश्चिम तीन हजार ७६८, पूर्व एक हजार ८९१, पैठण पाच हजार ९४६, गंगापूर पाच हजार २७१, तर वैजापूरमधून तीन हजार ८७१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कोणता फॉर्म कशासाठी :- फार्म ६ नुसार हे अर्ज आले आहेत. नवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज आले आहेत.- फॉर्म ७ नुसार मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार १९ अर्ज आले आहेत.- फॉर्म ८ नुसार नावासह दुरुस्तीसाठी सहा हजार २० अर्ज आले आहेत.- फॉर्म ८ (अ)नुसार स्थलांतरबाबतचे दोन हजार १२ अर्ज प्राप्त आले आहेत. 

टॅग्स :VotingमतदानAurangabadऔरंगाबाद