शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना वगळायचे आहे यादीतून नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 11:30 IST

दोन हजार मतदारांना बदलायचा आहे वॉर्ड, मतदारसंघ

औरंगाबाद : जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, तर दोन हजार मतदारांना मतदारसंघ किंवा वॉर्ड बदलून घ्यायचा आहे. ३७ हजार ७५९ नवमतदारांचे अर्ज आले आहेत.

निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, यात दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीस पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या ३७ हजार ७५९ जणांनी अर्ज दाखल केले असून, नावासह अन्य दुरुस्तीसाठी सहा हजारच्या वर मतदारांनी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमावर ५ डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येतील. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तीच अंतिम मतदारयादी २०२२ मध्ये होणाऱ्या महानगरपलिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.

नवीन मतदार होण्यासाठी किती जणांचे अर्जनवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक सहा हजार ५५१ अर्ज कन्नडमधून झाले, तर सिल्लोडमधून तीन हजार ५२३, फुलंब्री तीन हजार ६५६, औरंगाबाद मध्यमधून तीन हजार २८२, औरंगाबाद पश्चिम तीन हजार ७६८, पूर्व एक हजार ८९१, पैठण पाच हजार ९४६, गंगापूर पाच हजार २७१, तर वैजापूरमधून तीन हजार ८७१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

कोणता फॉर्म कशासाठी :- फार्म ६ नुसार हे अर्ज आले आहेत. नवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज आले आहेत.- फॉर्म ७ नुसार मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार १९ अर्ज आले आहेत.- फॉर्म ८ नुसार नावासह दुरुस्तीसाठी सहा हजार २० अर्ज आले आहेत.- फॉर्म ८ (अ)नुसार स्थलांतरबाबतचे दोन हजार १२ अर्ज प्राप्त आले आहेत. 

टॅग्स :VotingमतदानAurangabadऔरंगाबाद