शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 22:51 IST

: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देथकबाकी वसुली मोहीम तीव्र : परिमंडळात १३२ कोटी ८ लाख रुपये थकबाकी

औरंगाबाद : थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.यापैकी मागील पंधरवड्यात थकबाकीपोटी १९४३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. या ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. याशिवाय ११ हजार १५९ ग्राहकांकडे २३ कोटी ४६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, त्यांचा तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी औरंगाबाद शहर मंडळातील २३७८ ग्राहकांकडे ५ कोटी ५८ लाख रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळातील ४०३२ ग्राहकांकडे ६ कोटी ६४ लाख रुपये थकबाकी, तर जालना मंडळातील ४७४९ ग्राहकांकडे १० कोटी ८३ लाख रुपये थकबाकी आहे.या मोहिमेत औरंगाबाद शहर मंडळात ३४०० ग्राहकांकडून २ कोटी ३९ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळात ५१९२ ग्राहकांकडून ४ कोटी ४ लाख रुपये, तर जालना मंडळात २५९६ ग्राहकांकडून ३ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. औरंगाबाद परिमंडळात ११ हजार १८८ ग्राहकांकडून १० कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली. दरम्यान, थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.चौकट ...परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांमध्ये थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिल न भरणाºया ४३ हजार ३०६ वीज ग्राहकांकडे १३२ कोटी ८ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत ११ हजार ४५९ ग्राहकांकडे ३२ कोटी ९४ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत १७ हजार ३ ग्राहकांकडे ५१ कोटी ६६ लाख, तर जालना मंडळामध्ये १४ हजार ८४४ ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनांच्या १७७९ जोडण्या असून, त्यांच्याकडे ५४ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असून, शहरी भागातील पथदिव्यांच्या ४४८ जोडण्यांकडे ८ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण