शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

पोलिसांच्या परवानगीने लागले १२६२ लग्न

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमाची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या अटीवर लग्न ...

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईला सुरुवात झाली आहे. संसर्ग टाळण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमाची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या अटीवर लग्न लावण्यास परवानगी दिली जात आहे. चालू लग्न हंगामात आजपर्यंत पोलीस आयुक्तालयाने १२६२ लग्नाला परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

मंगल कार्यालय, हॉटेल्स, लॉन्सवर लग्न सोहळ्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे; पण ५० लोकांच्या उपस्थितीतच लग्न लावावे अशी अट घालून देण्यात आली आहे, तसेच मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत. लग्नात होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्य सरकारने काही नियम करून दिले आहेत. त्यात महापालिका व पोलीस विभागाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुळात प्रशासनाची परवानगी घेतली नसेल तर मंगल कार्यालय किंवा लॉन्स, हॉटेल व्यवस्थापक तुम्हाला लग्न लावू देणार नाही. या नियमाची शहरात काटेकोरपणे पालन केले जात आहे. परवानगीसाठी प्रत्येक मनपा वॉर्ड कार्यालय व स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंगल कार्यालयाचा अर्ज, लग्नपत्रिका, वधू-वर कडील आधारकार्ड, जन्म दाखला, टीसी आदी कागदपत्रे वाॅर्ड अधिकाऱ्यांकडे द्यावी लागतात. मनपाने परवानगी दिल्यानंतर मंगल कार्यालय ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते तिथे जाऊन पोलिसांना वधू-वराचे आधारकार्ड, टी. सी., परिसरातील पोलीस स्टेशनचे ना हरकत प्रमाणपत्र. मंगल कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, मनपाची परवानगी अशी सर्व कागदपत्रे दिल्यावर पोलीस आयुक्तालयातून लग्नाला परवानगी मिळते. आजपर्यंत पोलीस आयुक्तालयातून १२६२ लग्नाला परवानगी देण्यात आली आहे.

चौकट

अचूक आकडेवारी कळणार

शहरात दरवर्षी लग्नसराईत किती लग्न लागतात याची एकत्रित आकडेवारी प्रशासनाकडे नव्हती. मात्र, कोरोनाच्या निमित्ताने परवानगी सक्तीची करण्यात आल्याने पोलीस आयुक्तालय व मनपा यांच्याकडे संपूर्ण लग्नसराईत किती लग्न लागले. लग्न करणाऱ्यांची माहिती असणार आहे. या आकडेवारीचा फायदा जीएसटी विभाग व आयकर विभागालाही होणार आहे.