शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

११ वी प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:14 IST

अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलै रोजी ही प्रवेश प्रक्रिया संपणार होती. मात्र मुंबई, नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे सुरुवातीला वेळापत्रक बदलावे लागले. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेवरून नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे यानंतर दोनदा बदल झाले. या गोंधळामुळे तब्बल महिनाभर विलंबाने प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. चौथ्या फेरीत ३ हजार ६९४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली होती. या विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र ही फेरी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी १३ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. तसेच चौथ्या फेरीत अलॉटमेंट केलेल्या जागा सोडूनही ११ हजार ६०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३ व १४ आॅगस्ट रोजी पाचव्या विशेष फेरीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर १८ आॅगस्ट रोजी या फेरीतील विद्यार्थ्यांची अलॉटमेंट जाहीर होईल. या फेरीतील विद्यार्थ्यांना १८ ते २१ आॅगस्टदरम्यान प्रवेश घ्यावे लागतील. या फेरीनंतरही रिक्त जागांवर तेथून पुढे स्पॉट अ‍ॅडमिशन देता येणार आहेत. यामुळे सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र