शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

११ वी प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:14 IST

अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अ‍ॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलै रोजी ही प्रवेश प्रक्रिया संपणार होती. मात्र मुंबई, नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे सुरुवातीला वेळापत्रक बदलावे लागले. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेवरून नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे यानंतर दोनदा बदल झाले. या गोंधळामुळे तब्बल महिनाभर विलंबाने प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. चौथ्या फेरीत ३ हजार ६९४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली होती. या विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र ही फेरी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी १३ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. तसेच चौथ्या फेरीत अलॉटमेंट केलेल्या जागा सोडूनही ११ हजार ६०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३ व १४ आॅगस्ट रोजी पाचव्या विशेष फेरीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर १८ आॅगस्ट रोजी या फेरीतील विद्यार्थ्यांची अलॉटमेंट जाहीर होईल. या फेरीतील विद्यार्थ्यांना १८ ते २१ आॅगस्टदरम्यान प्रवेश घ्यावे लागतील. या फेरीनंतरही रिक्त जागांवर तेथून पुढे स्पॉट अ‍ॅडमिशन देता येणार आहेत. यामुळे सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र