गेवराई : जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात कापूस उपटण्याचा चिमटा घालून निर्घृन हत्या केल्याची घटना सोमवारी खांडवी येथे घडली. याप्रकरणी रात्री उशिरा गेवराई पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाभिषण नाईकवाडे, प्रशांत गंगाभिषण नाईकवाडे, बालाजी ढेंगळे, श्रीराम ढेंगळे, सुशील देवलकर, गोपीकिशन नाईकवाडे, सुदाम ढेंगळे, वृंदावणी ढेंगळे, आशाबाई नाईकवाडे, कुंताबाई नाईकवाडे व इतर एक यांचा आरोपीत समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि बोर्डे करीत आहेत. दरम्यान, मयत श्रीकिसन रघुनाथ नाईकवाडे यांची व गंगाभीषण रघुनाथ नाईकवाडे व गोपीकिसन रघूनाथ नाईकवाडे या तिघांची खांडवी फाट्यावर राष्ट्रीय महामार्गाला चिकटून या तिघांची वडिलोपार्जीत जमीन आहे. या जमिनीवरुन त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद धूमसत होता. सोमवारी सकाळी शेतातच त्यांच्यातील वाद उफाळून आला. वादाचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. त्यात श्रीकिसन रघुनाथ नाईकवाडे यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)
गेवराई तालुक्यातील खून प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST