शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

१०४ गावे होणार कॅशलेस

By admin | Updated: January 10, 2017 00:02 IST

जालना :जिल्ह्यातील १०४ बँकांनी १०४ गावे दत्तक घेतली असून, ही गावे कॅशलेस करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला आहे.

जालना : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच गावे कॅशलेस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला बँकांनी प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील १०४ बँकांनी १०४ गावे दत्तक घेतली असून, ही गावे कॅशलेस करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला आहे. गतवर्षी ८ नोव्हेंबर रोजी हजार व पाचशे रूपयांच्या झालेल्या नोटाबंदीनंतर व्यवहार ठप्प झाले होते. दोन हजार रूपयांचे सुटे नसल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक हातबल झाले होते. एकूणच नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी व रोखी ऐवजी आॅनलाईन अथवा कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बँक अधिकाऱ्यांना सर्वच बँकांना आवाहन केले होत. जिल्ह्यातील १०४ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना गावे कॅशलेस करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. एका बँकेने एक म्हणजेच १०४ गावे पहिल्या टप्प्यात कॅशलेस होणार आहेत. लगेच गावे कॅशलेस होणार नसली तरी मध्यमवयीन व युवा पिढीने कॅशलेस व्यवहार करण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे. या सर्व गावांत बँकांकडून कॅशलेस व्यवहार किती सोयीस्कर आणि सोपा आहे याबाबत शिबिराच्या माध्यमातून पटवून दिले जात आहे. काही बँकांनी या गावात डेबिट कार्ड, रूपे कार्डचे वाटप केले आहे. त्यामुळे ज्या ग्रामस्थांकडे एटीएम कार्ड नव्हते ते त्यांना देऊन व्यवहार कसे करावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक बँकेने ग्राहकांची गरज व मागणीनुसार डेबिट व रूपे कार्ड दिले आहेत.यासोबत घरबसल्या बँकेचे व्यवहार करता यावेत म्हणून माबाईल बँकिंग, आॅनलाईन बँकिंगचे कशी करावी याचे नियमित मार्गदर्शन करण्यात येत आहे. जे ग्राहक मोबाईल बँकिंग करू शकतात त्यांच्या मोबाईलमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेचे अ‍ॅपही उपलब्ध असून ग्राहकही वेळेची बचत तसेच कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रतिसाद देत आहेत. (प्रतिनिधी)