शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

१०४ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:19 IST

उमरगा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गट व गणातून तब्बल १२३ जणांनी माघार घेतली़

उमरगा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गट व गणातून तब्बल १२३ जणांनी माघार घेतली़ यात गटातून ६७ तर गणातून ५६ जणांनी अर्ज काढून घेतले़ आता जिल्हा परिषदेच्या ९ गटासाठी ३८ तर पंचायत समितीच्या १८ गणासाठी ६६ असे एकूण १०४ उमेदवार आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ यात गटामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपाने सर्वच जागांवर तर राष्ट्रवादीचे सहा ठिकाणी उमेदवार आहेत़ गणाची परिस्थिती पाहता काँग्रेस व शिवसेनेने सर्वच १८ जागांवर उमेदवार दिले आहेत़ तर राष्ट्रवादीचे केवळ १० जागांवर उमेदवार आहेत़जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून तालुक्यातील राजकीय आखाडा चांगलाच पेटला होता़ उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठी फिल्डींग लावली होती़ उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षश्रेष्ठींनी काहींना उमेदवारी दिली़ उमेदवारी अर्ज न मिळाल्याने काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी १०५ जणांनी अर्ज दाखल केले होते़ तर पंचायत समितीसाठी १२२ जणांनी अर्ज भरला होता़ त्यानंतर कोण अर्ज मागे घेणार आणि कोण बंडखोरी करीत निवडणूक आखाड्यात उतरणार यावर चर्चा रंगली होती़ मात्र, नेतेमंडळींनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याने अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी उमेदवारी मागे घेतली आहे़ त्यामुळे पक्षाकडून अर्ज भरलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे़ जिल्हा परिषदेच्या दाळींब गटात सर्वाधिक सहा तर पंचायत समितीच्या माडज गणात सर्वाधिक सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ काही गट-गणात तिरंगी तर कुठे चौरंगी लढत होत आहे़ काँग्रेसच्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वच जागांवर उमेदवार उभा केले आहेत़ मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेना यावेळी पूर्ण ताकदिनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे़ तर मोजक्या जागांवर उमेदवार उभा करून त्यावरच लक्ष केंद्रीत करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीने आखल्याचे दिसत आहे़ अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक चर्चेत असलेले काँग्रेसचे दगडू मोरे यांनी कुन्हाळी गटातून तर बालक मदने यांनी कवठा गटातून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत़ शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांनी तुरोरी गटातील अर्ज माघारी घेत कुन्हाळीतून निवडणूक लढविणे पसंत केले आहे़ तर गुंजोटी गटातील आरपीआयचे हरिष डावरे यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे़ सर्वच पक्षातील नारजांची मनधरणी करण्यात पक्षप्रमुखांना बरेचशे यश आले आहे़ त्यामुळे जिल्हा परिषद गटातून ६७ तर पंचायत समिती गणातून ५६ जणांनी माघार घेतली आहे़ असे असले तरी त्यांची निवडणूक प्रक्रियेतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे़ यंदा शिवसेना व काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी होती़ तिकीट न मिळाल्याने काही जणांची नाराजी कायम असून, याचा फटका उमेदवारांना बसू नये, यासाठीही नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आहे़ दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणामध्ये नऊ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ यात गटामध्ये पाच तर गणामध्ये चार उमेदवार उभे आहेत़ हे अपक्ष उमेदवार कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जड जाणार आणि किती मते घेणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे़