शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

शंभर किलोमीटर रस्त्यांच्या कामाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:04 IST

आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, या भीतीपोटी जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. बांधकाम विभागाने तब्बल २५ कोटी ९४ लाख रुपये खर्च करून १०० किलोमीटर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : २५ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित

औरंगाबाद : आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, या भीतीपोटी जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. बांधकाम विभागाने तब्बल २५ कोटी ९४ लाख रुपये खर्च करून १०० किलोमीटर रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन केले आहे.चालू आर्थिक वर्षात जिल्हा विकास समितीकडून लेखाशीर्ष ३०:५४ अंतर्गत जवळपास २६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या लेखाशीर्ष अंतर्गत प्रामुख्याने ग्रामीण रस्ते मजबुतीकरणाची कामे केली जातात, तर ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत निधीतून जिल्हा रस्ते मजबुतीकरणाची कामे केली जातात. यंदा या लेखाशीर्ष अंतर्गत २९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला होता. दरम्यान, ३०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत प्राप्त निधीतून गेल्या आठवड्यात २५ कोटी ९४ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यात नवीन १५ पूल तयार करण्याच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, ३० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांना स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे, तर ३० लाखांपेक्षा कमी रकमेच्या कामांना बांधकाम विषय समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे.बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी सांगितले की, ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत प्राप्त निधीतून जिल्हा रस्ते मजबुतीकरणाच्या कामांचेही लवकरच नियोजन केले जाईल. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या लेखाशिर्ष अंतर्गतची कामे केली जात होती. दोन वर्षांपासून शासनाने हे लेखाशीर्ष जिल्हा परिषदेकडे वर्ग केले आहे. त्यामुळे या लेखाशीर्षमधून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांसाठी आमदार- खासदारांनी जिल्हा परिषदेकडे शिफारशी केल्या आहेत. दरम्यान, आमदार- खासदारांच्या शिफारशींना अनेक सदस्यांनी विरोध केला आहे. या जिल्ह्याचे आमदार- खासदार हे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची कामे व्हावीत, यासाठीच ते आग्रही आहेत. त्यामुळे त्यांच्या शिफारशी एकदमच डावलणे योग्य होणार नाही. फार तर त्यांनी मागितलेल्या निधीमध्ये थोडीफार कपात करता येईल.चौकट ...सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्नयासंदर्भात बांधकाम सभापती विलास भुमरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, या दोन्ही लेखाशीर्ष अंतर्गत प्राप्त निधीतून सर्व जि.प. सदस्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल. कोणत्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ. आठवडाभरात ५०:५४ लेखाशीर्ष अंतर्गत जवळपास कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा