शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

१०० कोटींचीमुदतबाह्य औषधी विक्रेत्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:03 IST

पूर्वी मुदतबाह्य औषधी विक्रेत्यांकडून कंपन्या परत घेत असत. त्यावर करामध्येही त्यांना सूट मिळत असे; मात्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर राज्यात विनानोंदणीकृत व कम्पोजिशनअंतर्गत येणाºया सुमारे ८० टक्के औषधी विक्रेत्यांना मुदतबाह्य औषधीच्या बदल्यात कोणतीही सवलत मिळत नाही. कंपन्यांनीही अशा विक्रेत्यांकडून मुदतबाह्य औषधी घेणे बंद केले आहे.

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पूर्वी मुदतबाह्य औषधी विक्रेत्यांकडून कंपन्या परत घेत असत. त्यावर करामध्येही त्यांना सूट मिळत असे; मात्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर राज्यात विनानोंदणीकृत व कम्पोजिशनअंतर्गत येणाºया सुमारे ८० टक्के औषधी विक्रेत्यांना मुदतबाह्य औषधीच्या बदल्यात कोणतीही सवलत मिळत नाही. कंपन्यांनीही अशा विक्रेत्यांकडून मुदतबाह्य औषधी घेणे बंद केले आहे. परिणामी, १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची मुदतबाह्य औषधी राज्यातील विक्रेत्यांकडे साठली आहे. हा प्रश्न एकट्या महाराष्ट्राचा नसून संपूर्ण भारतातील औषध विक्रेत्यांचा आहे.औषधी व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार मुदतबाह्य औषधीची विल्हेवाट कायदेशीर पद्धतीनेच लावावी लागते. बाजारातील मुदतबाह्य औषधी उत्पादक कंपनीपर्यंत पोहोचविण्यासाठी एक साखळी तयार करण्यात आली आहे. यात किरकोळ विक्रेते त्यांच्याकडील मुदतबाह्य औषधी ठोक विक्रेत्याकडे पाठवीत असतो. नंतर त्यांच्याकडे जमा झालेली औषधी ठोक विक्रेता उत्पादक कंपनीकडे पाठवितो. औषध निर्माता कंपनी साक्षीदारांसमोर ही सर्व मुदतबाह्य औषधी नष्ट करतात. जीएसटीची अंमलबजावणी होण्याआधी व्हॅट (मूल्यवर्धित कर) लागू होता. व्हॅटमध्ये किमतीवर कर लागे, आता जीएसटी लागू झाल्यापासून पुरवठ्यावर कर द्यावा लागत आहे. त्यावेळी मुदतबाह्य औषधींवर ‘नो कर्मशियल व्हॅल्यू’ असा शिक्का मारला जात होता. ही औषधी कंपनीकडे ठोक विक्रेत्यामार्फत कंपनीकडे परत केल्यावर कंपनी ठोक विक्रेत्यास क्रेडिट नोट पाठवत होत्या. त्यानंतर ठोक विक्रेता किरकोळ विक्रेत्याला पुढील बिलामध्ये तेवढी रक्कम कमी करीत असे; मात्र आता ज्या किरकोळ व्यापाºयांनी जीएसटीमध्ये नोंदणी केली नाही किंवा कम्पोजिशन स्किममध्ये नोंदणी केली आहे, अशा विक्रेत्यांना मुदतबाह्य झालेला माल परत करताना त्यांनी भरणा केलेल्या कराचा परतावा त्यास मिळू शकत नाही. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा विचार केला तर येथे ६० हजार औषधी विक्रेते आहेत. त्यातील ८० टक्के विक्रेत्यांमध्ये काहींची जीएसटीत नोंदणी नाही, तर काहींनी कम्पोजिशन स्किममध्ये नोंदणी केली आहे. दरवर्षी औषध विक्रीत १५ हजार कोटींची उलाढाल होते. यात दरवर्षी अडीच टक्के औषधी (३७५ कोटी) मुदतबाह्य होत असतात. त्या नष्ट करण्यासाठी कंपनीला परत पाठविल्या जातात.जीएसटी लागू झाल्यापासून मागील चार महिन्यांत प्रत्येक औषधी विक्रेत्याकडे कमीत कमी २५ ते ५० हजार रुपयांची मुदतबाह्य औषधी जमा झाली आहे. राज्यात सुमारे १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची मुदतबाह्य औषधी पडून असल्याची माहिती नावंदर यांनी दिली. मुदतबाह्य औषधींचा साठा दुकानात वाढत असल्याने व त्यावर मागील पाच महिन्यांत काहीच निर्णय होत नसल्याने आता विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.