शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

वक्फ बोर्डाच्या जमिनीत १०० कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : वक्फ बोर्डाची जमीन मुस्लिम समाजातील विधवा, अनाथ मुलं आणि सामाजिक कार्यासाठी वापरावी, असे बोर्डाच्या ॲक्टमध्ये नमूद केलेले ...

औरंगाबाद : वक्फ बोर्डाची जमीन मुस्लिम समाजातील विधवा, अनाथ मुलं आणि सामाजिक कार्यासाठी वापरावी, असे बोर्डाच्या ॲक्टमध्ये नमूद केलेले असतानाही कोट्यधीश मंडळींना खैरात समजून या जमिनी वाटण्यात आल्या. जालना रोडवरील मोंढा नाका भागात सर्वाधिक १०० कोटी रुपयांच्या जमिनी वाटल्याचा आरोप खा. इम्तियाज जलील यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केला.

आकाशवाणीसमोरील सर्व्हे नंबर ३३ मधील २० एकर ९ गुंठे जमीन वक्फ बोर्डाची आहे. बोर्डाने ही जमीन मुतवल्ली यांना देखभालीसाठी दिली होती. नगर भूमापन क्रमांक १२५०३ मधील जवळपास एक लाख चौरस फूट मिळकत कैलास मोटर्स यांना ९९ वर्षांच्या करारावर दिली. याआधारे कैलास मोटर्स, पुणे यांनी महसूल अभिलेखात नाव नोंदवून घेतले. त्यानंतर महापालिकेने कोणतीही शहानिशा न करता बांधकाम परवानगी दिली. कैलास एजन्सीतर्फे मुखत्यार आम म्हणून राजू तनवानी, जुगलकिशोर तापडिया, बालाजी पाटील यांच्या नावे दस्त नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे या भागातील एक भाडेपट्टा प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मकरंद मधुकर आनासपुरे यांना देण्यात आला. सुनील बबनराव इंगळे, प्रदीप मलकानी, राजू मलकानी, विनोद चोटलानी, सुनील चोटलानी यांना दस्त करून देण्यात आले. याठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या आहेत. वक्फ बोर्डाची एनओसी नसताना महापालिकेने बांधकाम परवानगी कशी दिली, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. दस्त नोंदणी करणारे रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारीही तेवढेच दोषी आहेत. जमिनीची मोजणी करून देणारे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारीही दोषी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खा. जलील म्हणाले, गृहमंत्री शुक्रवारी शहरात आलेले असताना आपण त्यांची भेट घेतली. वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याचे निवेदन त्यांना देण्यात आले. त्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एक महिन्यात चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास २६ फेब्रुवारीपासून मराठवाड्यातील हजार कार्यकर्त्यांसह आपण जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समीर साजिद, शहराध्यक्ष शहारेख नक्शबंदी यांची उपस्थिती होती.