शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबळीच्या आरोपाखाली पतीला दहा वर्षे सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:16 IST

हुंड्याची राहिलेली रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २९) आरोपी पती पुंजाराम विठ्ठलराव मुळे (३२, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) याला १० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांखाली एकूण दीड हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : हुंड्याची राहिलेली रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २९) आरोपी पती पुंजाराम विठ्ठलराव मुळे (३२, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) याला १० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांखाली एकूण दीड हजार रुपये दंड ठोठावला.विवाहिता भाग्यश्री पुंजाराम मुळे (२०, रा. सटाणा) हिने मृत्यूपूर्व जबाब दिला होता की, १ एप्रिल २००८ ला तिचे लग्न आरोपी पुंजाराम याच्याशी झाले होते. लग्नात एक लाख ११ हजार रुपये हुंडा व लग्न लावून देण्याचे ठरले होते. त्यानुसार भाग्यश्रीच्या वडिलांनी एक लाख रुपये दिले व लग्न लावून दिले. दोन महिने चांगले वागविल्यानंतर आरोपी पुंजाराम व सासू रुक्मिणीबाई हुंड्याच्या उर्वरित ११ हजार रुपयांसाठी भाग्यश्रीचा शारीरिक व मानसिक छळ करीत असत.१६ एप्रिल २०१० रोजीसुद्धा आरोपींनी ११ हजार रुपये आणावेत असा तगादा लावत भाग्यश्रीला मारहाण केली. नेहमीच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात भाग्यश्रीने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आग विझविताना आरोपी पुंजारामचा हातदेखील भाजला. भाग्यश्रीला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. तेथे पोलीस व तत्कालीन नायब तहसीलदार डी. एन. भारस्कर यांनी भाग्यश्रीचा जबाब नोंदविला. उपचारादरम्यान २७ एप्रिल २०१० रोजी भाग्यश्रीचा मृत्यू झाला. करमाड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.खटल्याच्या सुनावणीदरम्यान रुक्मिणीबाई मुळे हिचा मृत्यू झाला. सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात भाग्यश्रीचा मृत्यूपूर्व जबाब महत्त्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी पतीला ‘हुंडाबळी’च्या आरोपाखाली भादंवि कलम ३०४ (ब) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास , ‘शारीरिक व मानसिक छळा’च्या आरोपाखाली कलम ४९८ (अ) अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, ‘मारहाणी’च्या आरोपाखाली कलम ३२३ अन्वये ६ महिने साधी कैद व ५०० रुपये दंड, अपमान करण्याच्या आरोपाखाली कलम ५०४ अन्वये ६ महिने साधी कैद आणि ५०० रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :Courtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप