शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

ऑटोमोबाईल उद्योगात १० टक्क्यांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 14:46 IST

अनलॉकनंतर मात्र औरंगाबादच्या उद्योगांनी बऱ्यापैकी झेप घेतली आहे. यामध्ये बजाज ऑटो कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७ ते १० टक्के अधिक उत्पादन घेतले आहे, हे विशेष.

औरंगाबाद : चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे उद्योगांची घडी विसकटलेली असली तर अनलॉकनंतर मात्र औरंगाबादच्या उद्योगांनी बऱ्यापैकी  झेप  घेतली आहे. यामध्ये बजाज ऑटो कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७ ते १० टक्के अधिक उत्पादन घेतले आहे, हे विशेष.

कोरोनामुळे प्रत्येकाच्या जीवनशैलीत अमूलाग्र बदल होत आहे. वैयक्तिक वाहनांचा वापर करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे भारतीय  बाजारपेठा व निर्यातीमध्ये बजाज ऑटोच्या दुचाकींची गत वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली दिसून येत असल्याचे सीएमआयएचे  सचिव लोणीकर  यांनी  सांगितले. सध्या औरंगाबादचे उद्योग ७५ टक्के उत्पादन क्षमतेने सुरू आहेत. व्हेंडर्स आणि लघु उद्योजकांनीही आता गती घेतली आहे. परप्रांतीय  कामगार अजूनही वापस न आल्याने उद्योग नगरीला लवकरच कुशल कामगारांची कमतरता जाणवणार आहे. यंदा पाऊसपाणी चांगले असल्याने पुढील दोन महिने तरी उद्योगांसाठी चांगले असणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत यांनी सांगितले की लॉकडाऊनदरम्यान उद्योगांचे अर्थचक्र कोलमडले आहे. दि. १ सप्टेंबरपासून उद्योगांना बँकांचे हप्ते भरावे लागत आहेत. यामध्ये सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची आर्थिक कोंडी होत आहे. आता हे उद्योग सुरू असले तरी जवळपास ९० दिवसांनंतर त्यांच्या हातात पैसा येईल, त्यामुळे शासन यावर काही तरी मार्ग काढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :businessव्यवसायMIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबाद