शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

पाण्याअभावी दहा लाख टन ऊस धोक्यात !

By admin | Updated: June 16, 2014 01:14 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे़ पावसाने लांबण टाकल्याने शेतकरी धास्तावले आहेत़

पुरुषोत्तम करवा , माजलगावतालुक्यातील ऊसाचे क्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे़ पावसाने लांबण टाकल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ माजलगाव धरणातील पाणी ऊसासाठी पाटात सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे़माजलगाव येथील धरणाच्या सिंचनक्षेत्रात ऊसलागवड मोठ्या प्रमाणात केली जाते़ जयमहेश, माजलगाव व वैद्यनाथ कारखान्याला येथील ऊस पुरवला जातोे़ एकूण १० लाख टन ऊस पिकविणाऱ्या या तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे़ उसाचे पीक सध्या शेतशिवारात चांगलेच डोलू लागले आहे़ तोडणीला आलेला ऊस पाण्यावाचून करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे़ माजलगाव धरणात सध्या आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ यापैकी काही पाणी सिंदफणा धरणात पंधरा दिवसांपूर्वी सोडले होते़ त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता़ गुरांच्या पाण्याचा व काही प्रमाणात शेतपिकांच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागला होता़ मात्र, हे पाणी ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचले नाही़ पाण्याची पातळी खालावत चालल्याने विहिरी, बोअरचे पाणी आटत चालले आहे़ ऊस जागेवरच वाळून चालला असून त्यामुळे उत्पदाक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभीषण थावरे यांनी सांगितले़ त्यामुळे पीक वाचवायचे असेल तर माजलगाव धरणातून पाटात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे़ढोरगावचा दरवाजा उघडणारमाजलगाव धरणातील पाणी पाटात सोडण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ १८ जून रोजी शेतकऱ्यांना सोबत घेऊन ढोरगाव येथे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभीषण थावरे यांनी दिली़ पाणी सोडले नाही तर धरणाचा दरवाजा उघडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे़