शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Aurangabad Violence : राजाबाजार, नबाबपुऱ्यात १0 फुटांची गुलेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:12 IST

नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला

औरंगाबाद : शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होत आहे. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शास्त्राचा वापर दंगलीत केला. गोफणमधून गोट्यांचा मारा, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दगडांचा खच, पेट्रोल-डिझेल बॉम्बसाठी वाती, मिरची पूड घटनास्थळी सापडली आहे.

जुन्या शहराला वेठीला धरणा-या जातीय दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दंगल पूर्वनियोजितच असल्याचे स्पष्ट होते आहे. दंगलीत पेट्रोल-डिझेल बॉम्ब, दगडगोटे मारण्यासाठी बाहुबली, पद्मावत चित्रपटात दाखविलेल्या गुलेरचा वापर करण्यात आला. रस्त्यावरील दोन खांबांना मोठे रबर बांधून, त्याच्या मध्यभागात पोतडे ठेवले होते. या पोतड््यात फेकण्यात येणारे साहित्य ठेवण्यात येत होते. या पोतड्याला पाठीमागे ताणून धरल्यानंतर त्यातील दगडगोटे, गोट्यासह इतर साहित्य दूरवर फेकले जात असल्याचे दिसूनआले.

नवाबपुरा ते राजाबाजार रस्त्यावर गोट्यांचा (मंजे) खच पडल्याचे दिसून आले. गोफणीतून या गोट्यांचा मारा केला जाता होता. अनेक दारूच्या, पेट्रोलच्या बाटल्यांमध्येही या गोट्यांचा वापर केला. अनेक गोट्या जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. नवाबपुरा चौकातील चार मजली इमारतीच्या टेरेसवर दगडांचा खच पडलेला होता. या ठिकाणावरून दगड मारण्यात येत होते. या इमारतीमध्ये एकूण पाच कुटुंबे राहतात. खाली दंगल पेटल्याचे दिसताच कुटुंबातील महिला, मुलांना पाठीमागच्या दरवाजातून रात्री साडेआकरा वाजता बाहेर काढण्यात आले. याचवेळी या इमारतीमध्ये दंगलखोर घुसले होते. त्यांनी सर्व मजल्यांवरील दरवाजांच्या काचा, ड्रेनेजचे पाईप उद्ध्वस्त केले. याच इमारतीत मिरची पूड टाकलेली होती.

या इमारतीचा ताबाच सकाळी आठ वाजेपर्यंत दंगलखोरांकडे होता. टेरेसवर पोत्यांमधून आलेल्या दगडगोट्यांची कोणतीही कल्पना नसल्याचे इमारतीचे मालक अब्दुल समद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कुटुंबातील सदस्य जिवाच्या आकांताने बाहेर पडले. त्यानंतर इमारतीत कोण आले, याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस