शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
4
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
5
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
6
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
7
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
8
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
9
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
10
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
11
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
12
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
13
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
15
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
16
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
17
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
18
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
19
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
20
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
Daily Top 2Weekly Top 5

बाभळीतून १ हजार दलघमी पाणी तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:24 IST

न्यायालयीन निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या बाभळी बंधा-यातून चालू पावसाळ्यात पावसात तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे. आता न्यायालयीन निर्णयानुसार २९ आॅक्टोबर रोजी बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद होणार असले तरी दरवर्षी वाहून जाणा-या पाण्यावर शासन काही मार्ग काढणार की नाही? हा प्रश्न पुढे आला आहे.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : न्यायालयीन निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या बाभळी बंधा-यातून चालू पावसाळ्यात पावसात तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे. आता न्यायालयीन निर्णयानुसार २९ आॅक्टोबर रोजी बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद होणार असले तरी दरवर्षी वाहून जाणा-या पाण्यावर शासन काही मार्ग काढणार की नाही? हा प्रश्न पुढे आला आहे.चारवर्षापूर्वी उद्घाटन झालेल्या बाभळी बंधाºयात आजघडीला गेटजवळ दोन मीटर पाणी आहे. सध्या गोदावरीमध्ये येणारा पाण्याचा फ्लो थांबला आहे. त्यामुळे बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद केले तरीही पाण्याचा साठा होण्याची सुतराम शक्यता नाही. मागील तीन वर्षात अपुºया पर्जन्यमानामुळे तेलंगणात जादा प्रमाणात पाणी जावू शकले नव्हते. पण यंदा मात्र संपूर्ण मराठवाड्यात पावसाळ्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही मराठवाड्यातील धरणे पूर्णत: भरली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे.या धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. हे संपूर्ण पाणी तेलंगणात पोहचले. बाभळी बंधाºयातून १ जुलै ते २८ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे.बाभळी बंधाºयास तत्कालीन आंध्र प्रदेशातील राजकीय नेत्यांसह सर्वांनीच कडाडून विरोध केला होता. या बंधाºयाचे प्रकरण न्यायालयातही पोहचले. आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्र आमच्या हक्काचे पाणी पळवत असल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला होता. हा युक्तीवाद खोडून काढताना तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधीनी बाभळी हे धरण नसून एक बंधारा असल्याचे नमुद केले होते. मान्सूननंतर वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी हा बंधारा उभारल्याचे सांगितले होते. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी आंध्र प्रदेशात जाण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. जललवादासमोर शेवटी आॅक्टोबर अखेरर्पंत बंधाºयाचे दरवाजे उघडे ठेवले जातील, या बाबीला मान्यता देण्यात आली. त्यानुसारच आॅक्टोबर अखेर पर्यंत बंधाºयाचे दरवाजे उघडे ठेवले जातात.मात्र बाभळी बंधारा प्रकरणात आता राज्यशासनाला नव्याने भूमिका मांडावी लागणार आहे. पाटबंधारे विभाग याबाबत शासनाला आवश्यक ती माहिती सातत्याने देत असली तरी राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न अडगळीलाच पडला आहे. याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे.पावसाळ्याचे प्रमाण वरचेवर कमी होत असून पाण्याच्या थेंबा-थेंबाचे महत्व आहे. जिल्ह्यात जलसाठवण क्षमता निर्माण झाल्यास वाहून जाणारे हजारो दलघमी पाणी साठवून ठेवले जावू शकते. मात्र आजघडीलाही आहे त्या योजनाही सुरू करण्यास शासन उदासिनता दाखवत आहे.धर्माबादसह उमरी, नायगाव तालुक्यातील काही पाणी पुरवठा योजनाही बाभळी बंधाºयावरील जलसाठ्यावर कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावीत आहेत.मात्र बाभळी बंधारा परिसरात आजघडीला जवळपास १२ लिफ्ट एरिगेशन प्रकल्प बंद पडले आहेत. त्या सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून नव्या योजना कार्यान्वित करण्याच्या अपेक्षा कशा बाळगाव्यात, हाही प्रश्न निर्माण झाला आहे.