शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाभळीतून १ हजार दलघमी पाणी तेलंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:24 IST

न्यायालयीन निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या बाभळी बंधा-यातून चालू पावसाळ्यात पावसात तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे. आता न्यायालयीन निर्णयानुसार २९ आॅक्टोबर रोजी बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद होणार असले तरी दरवर्षी वाहून जाणा-या पाण्यावर शासन काही मार्ग काढणार की नाही? हा प्रश्न पुढे आला आहे.

अनुराग पोवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : न्यायालयीन निर्णयाच्या कचाट्यात अडकलेल्या बाभळी बंधा-यातून चालू पावसाळ्यात पावसात तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे. आता न्यायालयीन निर्णयानुसार २९ आॅक्टोबर रोजी बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद होणार असले तरी दरवर्षी वाहून जाणा-या पाण्यावर शासन काही मार्ग काढणार की नाही? हा प्रश्न पुढे आला आहे.चारवर्षापूर्वी उद्घाटन झालेल्या बाभळी बंधाºयात आजघडीला गेटजवळ दोन मीटर पाणी आहे. सध्या गोदावरीमध्ये येणारा पाण्याचा फ्लो थांबला आहे. त्यामुळे बाभळी बंधाºयाचे दरवाजे बंद केले तरीही पाण्याचा साठा होण्याची सुतराम शक्यता नाही. मागील तीन वर्षात अपुºया पर्जन्यमानामुळे तेलंगणात जादा प्रमाणात पाणी जावू शकले नव्हते. पण यंदा मात्र संपूर्ण मराठवाड्यात पावसाळ्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही मराठवाड्यातील धरणे पूर्णत: भरली. विशेष म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे.या धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. हे संपूर्ण पाणी तेलंगणात पोहचले. बाभळी बंधाºयातून १ जुलै ते २८ आॅक्टोबर या कालावधीत तब्बल १ हजार ६१.२०० दलघमी पाणी तेलंगणात वाहून गेले आहे.बाभळी बंधाºयास तत्कालीन आंध्र प्रदेशातील राजकीय नेत्यांसह सर्वांनीच कडाडून विरोध केला होता. या बंधाºयाचे प्रकरण न्यायालयातही पोहचले. आंध्र प्रदेश सरकारने महाराष्ट्र आमच्या हक्काचे पाणी पळवत असल्याचा युक्तीवाद न्यायालयात केला होता. हा युक्तीवाद खोडून काढताना तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधीनी बाभळी हे धरण नसून एक बंधारा असल्याचे नमुद केले होते. मान्सूननंतर वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी हा बंधारा उभारल्याचे सांगितले होते. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी आंध्र प्रदेशात जाण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. जललवादासमोर शेवटी आॅक्टोबर अखेरर्पंत बंधाºयाचे दरवाजे उघडे ठेवले जातील, या बाबीला मान्यता देण्यात आली. त्यानुसारच आॅक्टोबर अखेर पर्यंत बंधाºयाचे दरवाजे उघडे ठेवले जातात.मात्र बाभळी बंधारा प्रकरणात आता राज्यशासनाला नव्याने भूमिका मांडावी लागणार आहे. पाटबंधारे विभाग याबाबत शासनाला आवश्यक ती माहिती सातत्याने देत असली तरी राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न अडगळीलाच पडला आहे. याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे.पावसाळ्याचे प्रमाण वरचेवर कमी होत असून पाण्याच्या थेंबा-थेंबाचे महत्व आहे. जिल्ह्यात जलसाठवण क्षमता निर्माण झाल्यास वाहून जाणारे हजारो दलघमी पाणी साठवून ठेवले जावू शकते. मात्र आजघडीलाही आहे त्या योजनाही सुरू करण्यास शासन उदासिनता दाखवत आहे.धर्माबादसह उमरी, नायगाव तालुक्यातील काही पाणी पुरवठा योजनाही बाभळी बंधाºयावरील जलसाठ्यावर कार्यान्वीत करण्याचे प्रस्तावीत आहेत.मात्र बाभळी बंधारा परिसरात आजघडीला जवळपास १२ लिफ्ट एरिगेशन प्रकल्प बंद पडले आहेत. त्या सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाकडून नव्या योजना कार्यान्वित करण्याच्या अपेक्षा कशा बाळगाव्यात, हाही प्रश्न निर्माण झाला आहे.