शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

चोरीचे १ लाखांचे सागवान रेल्वेतून जप्त

By admin | Updated: May 24, 2014 00:43 IST

किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़

किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़ अंधाराचा फायदा घेत लाकूड चोरटे तर पळालेच, पण काही नगही घेवून ते पसार झाले़ हा प्रकार किनवट रेल्वेस्टेशनवर घडला़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे रेल्वेस्टेशन आंध्रा सीमावर्ती आहे़ या मार्गावरून अनेक रेल्वे ये-जा करतात़ प्रवाशांसाठी असणार्‍या रेल्वे गाड्यांचा सर्रास वापर लाकूड चोरट्यांनी लाकूड तस्करीसाठी, दारू तस्करीसाठी चालविला आहे़ प्रवाशांना त्रास देत या तस्करी बिनभोबाटपणे सुरू असतानाही रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिस मूग गिळून गप्पच आहेत़ २३ मे रोजी आदिलाबाद ते परळी-पूर्णा या पॅसेंजर गाडीने सागवान लाकडे सीमावर्ती अंबाडी जंगलातून किनवट येथे येत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली़ त्यावरून किनवटचे वनक्षेत्रपाल बी़पी़ आडे, वनपाल एस़बी़ कोळी, डी़आऱ वळदकर, आऱबी़ पोतदार, ए़बी़ राठोड, भारत गोफणे, खामकर, गुरूसिंगे, घोडके, वनमजूर भरगे, पवार, शे़रफीक पुय्यड, शे़अप्सर यांनी किनवट पोलिस स्थानकावर रेल्वे डब्यातून सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार पाट काढलेले १९ नग जप्त केले़ यापूर्वीही धनबाद एक्स्प्रेसमधून व पॅसेंजर गाडीतून सागवान लाकडे वनविभागाने जप्त केली होती़ संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचारी याकडे कानाडोळ तर करतातच, पण अर्थपूर्ण व्यवहार करूनच गाडीत लाकडे टाकली जात असल्याचे सांगण्यात येते़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट व अंबाडी हे दोन रेल्वेस्टेशन अवैध दारू, गुटखा व लाकूड तस्करीसाठी अलीकडे चर्चेत आले आहे़ आदिलाबादहून येणार्‍या गाडीत सागवान लाकडे व गुटखा येतो तर जाणार्‍या गाडीत प्रचंड दारूचे बॉक्स जात असतानाही याला आळा घालण्यास कोणी पुढे येत नसल्याने याचा त्रास प्रवाशांना होत आहे़ परवाच अंबाडी येथून जाणारे दारूचे बॉक्स रेल्वेस्टेशन मास्तर व कर्मचार्‍यांनी रोखले़ मात्र दारू तस्करांनी हुज्जत तर घालीच, पण झटापट करून आपली व आल्या मालाची सुटका करून घेतली़ याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्धही केले होते़ पण लाकूडचोरटे, दारू तस्कर व गुटखा तस्कर यांचे व रेल्वेचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे देवाण-घेवाणीचे संबंध असल्यानेच सध्या रेल्वे प्रवाशांबरोबरच लाकूड, दारू, गुटखा तस्करीसाठी वापरली जात आहे़ रेल्वेने होणारी सागवानाची तस्करी पाहता नांदेडचे उपवनसंरक्षक यांनी रेल्वेच्या नांदेड येथील अधिकार्‍यांच्या ही बाब पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिली़ पण काहीच उपयोग झाला नसावा, असेच दिसून येते़ वेळीच लाकूड चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्यास अंबाडी व रेल्वे पटरीला लागून असलेले किनवट तालुक्यातील जंगल नष्ट होण्याची भीती वृक्षपे्रमी करीत आहेत़ (वार्ताहर)