शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे १ लाखांचे सागवान रेल्वेतून जप्त

By admin | Updated: May 24, 2014 00:43 IST

किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़

किनवट : २३ मे रोजी वनविभागाच्या गस्ती पथकाने आदिलाबाद-पूर्णा-परळी गाडीतून पहाटे ५ वाजता १ लाख रुपयांचे १९ मोठे सागवान नग जप्त केले़ अंधाराचा फायदा घेत लाकूड चोरटे तर पळालेच, पण काही नगही घेवून ते पसार झाले़ हा प्रकार किनवट रेल्वेस्टेशनवर घडला़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे रेल्वेस्टेशन आंध्रा सीमावर्ती आहे़ या मार्गावरून अनेक रेल्वे ये-जा करतात़ प्रवाशांसाठी असणार्‍या रेल्वे गाड्यांचा सर्रास वापर लाकूड चोरट्यांनी लाकूड तस्करीसाठी, दारू तस्करीसाठी चालविला आहे़ प्रवाशांना त्रास देत या तस्करी बिनभोबाटपणे सुरू असतानाही रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिस मूग गिळून गप्पच आहेत़ २३ मे रोजी आदिलाबाद ते परळी-पूर्णा या पॅसेंजर गाडीने सागवान लाकडे सीमावर्ती अंबाडी जंगलातून किनवट येथे येत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली़ त्यावरून किनवटचे वनक्षेत्रपाल बी़पी़ आडे, वनपाल एस़बी़ कोळी, डी़आऱ वळदकर, आऱबी़ पोतदार, ए़बी़ राठोड, भारत गोफणे, खामकर, गुरूसिंगे, घोडके, वनमजूर भरगे, पवार, शे़रफीक पुय्यड, शे़अप्सर यांनी किनवट पोलिस स्थानकावर रेल्वे डब्यातून सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार पाट काढलेले १९ नग जप्त केले़ यापूर्वीही धनबाद एक्स्प्रेसमधून व पॅसेंजर गाडीतून सागवान लाकडे वनविभागाने जप्त केली होती़ संबंधित रेल्वे अधिकारी, कर्मचारी याकडे कानाडोळ तर करतातच, पण अर्थपूर्ण व्यवहार करूनच गाडीत लाकडे टाकली जात असल्याचे सांगण्यात येते़ आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट व अंबाडी हे दोन रेल्वेस्टेशन अवैध दारू, गुटखा व लाकूड तस्करीसाठी अलीकडे चर्चेत आले आहे़ आदिलाबादहून येणार्‍या गाडीत सागवान लाकडे व गुटखा येतो तर जाणार्‍या गाडीत प्रचंड दारूचे बॉक्स जात असतानाही याला आळा घालण्यास कोणी पुढे येत नसल्याने याचा त्रास प्रवाशांना होत आहे़ परवाच अंबाडी येथून जाणारे दारूचे बॉक्स रेल्वेस्टेशन मास्तर व कर्मचार्‍यांनी रोखले़ मात्र दारू तस्करांनी हुज्जत तर घालीच, पण झटापट करून आपली व आल्या मालाची सुटका करून घेतली़ याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्धही केले होते़ पण लाकूडचोरटे, दारू तस्कर व गुटखा तस्कर यांचे व रेल्वेचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे देवाण-घेवाणीचे संबंध असल्यानेच सध्या रेल्वे प्रवाशांबरोबरच लाकूड, दारू, गुटखा तस्करीसाठी वापरली जात आहे़ रेल्वेने होणारी सागवानाची तस्करी पाहता नांदेडचे उपवनसंरक्षक यांनी रेल्वेच्या नांदेड येथील अधिकार्‍यांच्या ही बाब पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिली़ पण काहीच उपयोग झाला नसावा, असेच दिसून येते़ वेळीच लाकूड चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्यास अंबाडी व रेल्वे पटरीला लागून असलेले किनवट तालुक्यातील जंगल नष्ट होण्याची भीती वृक्षपे्रमी करीत आहेत़ (वार्ताहर)