शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

१ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:35 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभाग : ६१६ परीक्षा केंद्रे सज्ज; उद्यापासून सुरुवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून सुरू आहे. या परीक्षेनंतर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून (दि.१) सुरुवात होत आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ६१६ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था, एका वर्गात २५ विद्यार्थी, असे नियोजन करण्याच्या सूचना परीक्षा केंद्र संचालकांना मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी द्वितीय भाषेचा पेपर असणार आहे. या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी मंडळाने ३२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. यातील ८ भरारी पथके औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६ भरारी पथके तैनात केली आहेत. याशिवाय महसूल विभागाची बैठे पथके वेगळीच असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना शाई बदल, उत्तरपत्रिकांची पाने फाडणे, उत्तराशिवाय इतर मजकूर लिहू नये, याची काळजी घ्यावी, अन्यथा ही विद्यार्थ्यांची गंभीर चूक समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंडळातर्फे देण्यात आला.चौकटजिल्हा परीक्षा केंद्र विद्यार्थी भरारी पथकेऔरंगाबाद २२० ६५,४७७ ८बीड १५२ ४३,७०१ ६जालना ८७ २८,८२४ ६परभणी ९४ ३१,४०६ ६हिंगोली ५३ १६,६५३ ६------------------------------------------------एकूण ६१६ १,८६,०६६ ३२------------------------------------------------चौकटबारावीच्या परीक्षेत ४८ कॉपीबहाद्दर पकडलेबारावीच्या परीक्षेत मंडळातर्फे नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात ३७, बीड ६, परभणी जिल्ह्यात ५ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत मंडळाने पाच जिल्ह्यांत १७२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा