शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

१ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:35 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभाग : ६१६ परीक्षा केंद्रे सज्ज; उद्यापासून सुरुवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून सुरू आहे. या परीक्षेनंतर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून (दि.१) सुरुवात होत आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ६१६ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था, एका वर्गात २५ विद्यार्थी, असे नियोजन करण्याच्या सूचना परीक्षा केंद्र संचालकांना मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी द्वितीय भाषेचा पेपर असणार आहे. या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी मंडळाने ३२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. यातील ८ भरारी पथके औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६ भरारी पथके तैनात केली आहेत. याशिवाय महसूल विभागाची बैठे पथके वेगळीच असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना शाई बदल, उत्तरपत्रिकांची पाने फाडणे, उत्तराशिवाय इतर मजकूर लिहू नये, याची काळजी घ्यावी, अन्यथा ही विद्यार्थ्यांची गंभीर चूक समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंडळातर्फे देण्यात आला.चौकटजिल्हा परीक्षा केंद्र विद्यार्थी भरारी पथकेऔरंगाबाद २२० ६५,४७७ ८बीड १५२ ४३,७०१ ६जालना ८७ २८,८२४ ६परभणी ९४ ३१,४०६ ६हिंगोली ५३ १६,६५३ ६------------------------------------------------एकूण ६१६ १,८६,०६६ ३२------------------------------------------------चौकटबारावीच्या परीक्षेत ४८ कॉपीबहाद्दर पकडलेबारावीच्या परीक्षेत मंडळातर्फे नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात ३७, बीड ६, परभणी जिल्ह्यात ५ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत मंडळाने पाच जिल्ह्यांत १७२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा