शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ८६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:35 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देऔरंगाबाद विभाग : ६१६ परीक्षा केंद्रे सज्ज; उद्यापासून सुरुवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा १ मार्चपासून घेण्यात येणार आहे. यात औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतून १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय मंडळातर्फे देण्यात आली.शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा २२ फेब्रुवारीपासून सुरू आहे. या परीक्षेनंतर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून (दि.१) सुरुवात होत आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ६१६ परीक्षा केंद्रांवर १ लाख ८६ हजार ६६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था, एका वर्गात २५ विद्यार्थी, असे नियोजन करण्याच्या सूचना परीक्षा केंद्र संचालकांना मंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवशी द्वितीय भाषेचा पेपर असणार आहे. या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी मंडळाने ३२ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. यातील ८ भरारी पथके औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ६ भरारी पथके तैनात केली आहेत. याशिवाय महसूल विभागाची बैठे पथके वेगळीच असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना शाई बदल, उत्तरपत्रिकांची पाने फाडणे, उत्तराशिवाय इतर मजकूर लिहू नये, याची काळजी घ्यावी, अन्यथा ही विद्यार्थ्यांची गंभीर चूक समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंडळातर्फे देण्यात आला.चौकटजिल्हा परीक्षा केंद्र विद्यार्थी भरारी पथकेऔरंगाबाद २२० ६५,४७७ ८बीड १५२ ४३,७०१ ६जालना ८७ २८,८२४ ६परभणी ९४ ३१,४०६ ६हिंगोली ५३ १६,६५३ ६------------------------------------------------एकूण ६१६ १,८६,०६६ ३२------------------------------------------------चौकटबारावीच्या परीक्षेत ४८ कॉपीबहाद्दर पकडलेबारावीच्या परीक्षेत मंडळातर्फे नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने औरंगाबाद जिल्ह्यात ३७, बीड ६, परभणी जिल्ह्यात ५ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत मंडळाने पाच जिल्ह्यांत १७२ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा