शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

जि.प. लाखोंच्या मालमत्ताकराला मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

ग्रामविकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर वसुली करता येणार नाही. ही जबाबदारी आता एमआयडीसीकडे देण्यात आली. यातील अर्धा वाटा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. उर्वरित रकमेतून एमआयडीसी स्वत:चा खर्च काढून काही सुविधा ग्रामपंचायतीला पुरविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देएमआयडीसी करणार वसुली : १५ ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीचा ग्रामपंचायतचा अधिकार काढून घेतल्याचा फटका जिल्हा परिषदेला बसणार असून लाखोंच्या महसुलाला मुकावे लागणार आहे. या नवीन निर्णयामुळे जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रात असणाऱ्या १५ ग्रामपंचायतींच्या उत्पन्नालाही फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ग्रामविकास विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या निर्णयानुसार औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना थेट मालमत्ता कर वसुली करता येणार नाही. ही जबाबदारी आता एमआयडीसीकडे देण्यात आली. यातील अर्धा वाटा ग्रामपंचायतीला मिळणार आहे. उर्वरित रकमेतून एमआयडीसी स्वत:चा खर्च काढून काही सुविधा ग्रामपंचायतीला पुरविण्यात येणार आहेत. चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत ताडाळी, चिचाळा, मोरवा, नागाळा, साखरवाही, येरूर व भद्रावती, मूल, वरोरा तालुक्याच्या ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांकडून प्राप्त होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मालमत्ता करावर यापुढे निर्बंध येणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता करातून वसुली होणाऱ्या रकमेतून ५० टक्के रक्कम महामंडळाकडून ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीत जमा होणार आहे. उरलेल्या ५० टक्के रकमातून औद्यगिक क्षेत्रातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी खर्च करणार आहे. त्यामुळे आता औद्योगिक क्षेत्र असलेल्या गावांना काही सुविधांच्या अटींवर एमआयडीसीला कर द्यावा लागणार आहेत. ग्रामपंचायतच्या हद्दीतील कारखान्यांकडून पंचायत विभागाला लाखोंचा मालमत्ता कर मिळत होता. या करातून गावाचा विकास साधण्यासाठी मदत होती. मात्र नवीन निर्णयामुळे जिल्हा परिषदेला या कराला मुकावे लागणार आहे.कर थकविणाऱ्या कंपन्या येणार वठणीवरमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम १९६० अनुसार यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील विविध कर आणि फी आकारणी व वसूल करण्याचे अधिकार संबंधित ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत होते. मात्र, जिल्हा परिषदेतील ग्रामविकास विभाग आणि ग्रामपंचायतींनी करवसुलीसाठी उद्योग कंपन्यांना नोटीसा देऊनही त्या जुमानत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही विहित कालावधीत वसुली होत नाही. नवीन निर्णयानुसार कर वसुलीची जबाबदारी एमआयडीसीची आहे. यातून उत्पन्नाला काही प्रमाणात फटका बसेल. पण कर थकविणाऱ्या कंपन्या वठणीवर येऊ शकतात, अशी माहिती जि. प. च्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ शी बोलताना दिली.अशी होणार करवसुलीग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील जमीन, इमारती आणि मालमत्तांवरील सामान्य आरोग्य रक्षण उपकर, दिवाबत्ती, मालमत्ता कराची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने एमआयडीसी करणार आहे. वसुलीतील ५० टक्के रक्कम गटविकास अधिकारी पंचायत समितीकडून प्रमाणित करून आणलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या खात्यावरच जमा केली जाणार आहे. महामंडळाने प्रत्येक माहिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्यात वसूल झालेल्या कराचा ५० टक्के वाटा स्वत:कडे ठेवेल. उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यात १४ अशा शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.राज्य शासनाने ग्रामपंचायतींच्या मालमत्ताकराबाबत नवीन निर्णय घेतला. त्यानुसार पद्धत बदलविण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायतींची माहिती मागविण्यात येणार आहे.-राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.

टॅग्स :zpजिल्हा परिषद