शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

जिल्हा परिषद लावणार ३४ लाख १६ हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:16 IST

५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे करण्याचे पूर्ण झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमध्ये मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे करण्याचे पूर्ण झाले. ८२७ ग्रामपंचायतींमध्ये मोहीम सुरू करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल, अवेळी येणाऱ्या पावसामुळे नैसर्गिक वातावरण दिवसागणिक बिघडत आहे. वातावरणाचा समतोल निर्माण व्हावा व प्रत्येकाला जगण्यासाठी चांगले वातावरण मिळावे, यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करून वृक्ष जगविण्याची गरज आहे. राज्यात ३३ कोटी वृक्ष लावण्याची संकल्पना ना. मुनगंटीवार मांडली. या उपक्रमात जिल्हा परिषदने महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली. यावर्षी राज्यात ३३ कोटी वृक्षारोपणाचे काम पूर्ण करावयचे आहे. तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा महाराष्टÑ शासनाचा मानस आहे.वृक्षारोपणाची मोहीम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्याकरिता वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरूवारी वृक्ष दिंडीचा शुभारंभ केला जाणार आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदिंडीद्वारे गावात जागृती सभा घेण्यात येणार आहे. याशिवाय वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधल्या जाणार आहे. वृक्षदिंडीची सुरूवात जिल्हा परिषदपासून होईल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही दिंडी पोहोचणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष भोंगळे यांनी दिली. यावेळी जि. प उपाध्यक्ष कृष्णा सहारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक श्रीकांत बळदे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.३२ गावांमध्ये वृक्षदिंडीवृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३२ गावांमध्ये गुरूवारपासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत कलावंत, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ३२ गावांमध्ये वृक्षदिंडीवृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३२ गावांमध्ये गुरूवारपासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत कलावंत, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.२०१८ मध्ये ९ लाख वृक्ष जगविले२०१६ मध्ये जिल्हा परिषदने २ लाख २६ हजार ५११ वृक्ष लावले होते. त्यापैकी १ लाख ३५२ वृक्ष जगविले. २०१७ मध्ये लावलेल्या ४ लाख ३४ हजार ६६८ वृृक्षांपैकी २ लाख ८० हजार ९९९ तर २०१८ वर्षात ९ लाख ८७ हजार ४५० वृक्षांपैकी ९ लाख १ हजार ८९० वृक्ष जगविण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सर्व विभागांना उद्दिष्टग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, पाणी व स्वच्छता तसेच समाज कल्याण विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे.