शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

जिल्हा परिषद लावणार ३४ लाख १६ हजार वृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:16 IST

५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे करण्याचे पूर्ण झाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतींमध्ये मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत विविध गावात ३४ लाख १६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे करण्याचे पूर्ण झाले. ८२७ ग्रामपंचायतींमध्ये मोहीम सुरू करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल, अवेळी येणाऱ्या पावसामुळे नैसर्गिक वातावरण दिवसागणिक बिघडत आहे. वातावरणाचा समतोल निर्माण व्हावा व प्रत्येकाला जगण्यासाठी चांगले वातावरण मिळावे, यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण करून वृक्ष जगविण्याची गरज आहे. राज्यात ३३ कोटी वृक्ष लावण्याची संकल्पना ना. मुनगंटीवार मांडली. या उपक्रमात जिल्हा परिषदने महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली. यावर्षी राज्यात ३३ कोटी वृक्षारोपणाचे काम पूर्ण करावयचे आहे. तीन वर्षांत ५० कोटी वृक्षारोपण करण्याचा महाराष्टÑ शासनाचा मानस आहे.वृक्षारोपणाची मोहीम जिल्ह्यातील गावागावात यशस्वी करण्याकरिता वृक्षदिंडी व स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरूवारी वृक्ष दिंडीचा शुभारंभ केला जाणार आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी वृक्षदिंडीद्वारे गावात जागृती सभा घेण्यात येणार आहे. याशिवाय वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधल्या जाणार आहे. वृक्षदिंडीची सुरूवात जिल्हा परिषदपासून होईल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ही दिंडी पोहोचणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्ष भोंगळे यांनी दिली. यावेळी जि. प उपाध्यक्ष कृष्णा सहारे, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, महिला व बाल कल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कृषी व पशुसंवर्धन सभापती अर्चना जिवतोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय पचारे, नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक श्रीकांत बळदे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.३२ गावांमध्ये वृक्षदिंडीवृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३२ गावांमध्ये गुरूवारपासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत कलावंत, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ३२ गावांमध्ये वृक्षदिंडीवृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी ३२ गावांमध्ये गुरूवारपासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत कलावंत, जलतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.२०१८ मध्ये ९ लाख वृक्ष जगविले२०१६ मध्ये जिल्हा परिषदने २ लाख २६ हजार ५११ वृक्ष लावले होते. त्यापैकी १ लाख ३५२ वृक्ष जगविले. २०१७ मध्ये लावलेल्या ४ लाख ३४ हजार ६६८ वृृक्षांपैकी २ लाख ८० हजार ९९९ तर २०१८ वर्षात ९ लाख ८७ हजार ४५० वृक्षांपैकी ९ लाख १ हजार ८९० वृक्ष जगविण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली.सर्व विभागांना उद्दिष्टग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी, पाणी व स्वच्छता तसेच समाज कल्याण विभागाला उद्दिष्ट देण्यात आले आहे.