शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ३७ कोटी ८३ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आटले असताना शुक्रवारी नियोजन भवनात आयोजित सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड ...

चंद्रपूर : कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आटले असताना शुक्रवारी नियोजन भवनात आयोजित सर्वसाधारण सभेत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३७ कोटी ७२ लक्ष ४५ हजार ८०० रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सभागृहात सांगण्यात आले. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या काही तरतुदींवर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनीही आक्षेप नोंदविल्याने जि. प. वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.

राज्य शासनाकडून जमीन महसूल उपकर, सापेक्ष अनुदान आणि मुद्रांक कराचा निधी न मिळाल्याने नसल्याने त्याचे परिणाम २०२१-२२ च्या मूळ अंदाजपत्रकावर दिसून आले. अनेक विभागांतील निधीला कात्री लावण्याची वेळ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर आली आहे. अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी १० लक्ष ६ हजार १९४ रुपये शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. सन २०२०-२१ च्या सुधारित अंदाजपत्रकालाही या सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ चा ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३७ कोटी ७२ लक्ष ४५ हजार ८०० रुपयांचा खर्च गृहीत धरण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या उपस्थितीत अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सदस्यांनीही आक्षेप घेतला. सत्ताधारी गटातील जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी शून्य बजेट तर जीवतोडे यांनी खरेदी बजेट असल्याची टीका केली. काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर, चिमूरकर, गजानन बुटके यांनीही अर्थसंकल्पातील तरतुदींवर आक्षेप घेतला.

पाणीपुरवठ्यासाठी १३ कोटी ६३ लाख

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे देखभाल व दुरुस्तीसाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. १३ कोटी ६३ लाखांची तरतूद या विभागावर करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत मूल तालुक्यातील सोमनाथ येथे चारा बागेची निर्मिती करण्याकरिता अर्थसंकल्पात प्रथमच १९ लाखांची तरतूद करण्यात आली. समाजकल्याण विभागात वाढीव तरतूद करण्यात आली. महिला व बालकल्याण विभागालाही ७० लक्ष रुपये वाढीव तरतूद आहे.

अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये

अर्थसंकल्पात व्यवसाय व व्यापारावरील कर, जमीन महसूल, मुद्रांक व नोंदणी शुल्क, व्याजाच्या रक्कमा, सार्वजनिक मालमत्तेपासून उत्पन्न, शिक्षण, आरोग्य आणि कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, वनीकरण, कृषीविषयक कार्यक्रम, पंचायतराज कार्यक्रम आणि लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ३७ कोटी ८३ लक्ष ५ हजार ९९४ रुपये जमा होण्याचा अंदाज नोंदविण्यात आला आहे.

कृषी व वैयक्तिक लाभांच्या योजना गायब

सार्वजनिक मालमत्ता परिरक्षण, शिक्षण (५ टक्के), शिक्षण, बाजार आणि जत्रा, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, समाजकल्याण विभाग, अपंग कल्याण निधी, वनमहसूल अनुदान, महिला व बालकल्याण, सामाजिक सुरक्षा व कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत राज कार्यक्रम व लघु सिंचनावर ३७ कोटी ७२ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आरोग्य, कृषी आणि वैयक्तिक लाभांच्या योजनांना बजेटमध्ये स्थानच नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.

अर्थसंकल्पात फक्त एकच नवीन योजना

मूळ अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार सोमनाथ येथील चारा बागेची निर्मिती वगळल्यास कोणत्याही नवीन योजना राबविल्या जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे शासनाकडून निधी मिळत नसल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नियोजनासाठी तारांबळ उडत आहे. विकासकामे व योजनांवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.