शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील झी बाजाराला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठत होते. दरम्यान, याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.

ठळक मुद्देकोट्यवधींचे नुकसान : कपडे, प्लास्टिकच्या वस्तू, खेळण्याचे साहित्य जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जयंत टाकीज चौकात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झी बाजाराला रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कपडे, प्लास्टिकचे साहित्य, खेळण्याचे साहित्य आदी वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्याने ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जयंत टॉकीज चौकात मागील अनेक वर्षांपासून झी बाजार नियमित सुरू आहे. रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठत होते. दरम्यान, याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास १७ अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या ज्वाला निघत असल्याने दुरुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र यात यश येत नव्हते. त्यानंतर जेसीबी आणून त्याच्या सहाय्याने इमारतीचे छत तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ७ वाजताच्या सुमारास आगीच्या ज्वाळा शांत झाल्या. मात्र आतून आग धुमसतच होती. त्यामुळे अग्निशमन पथकाकडून सोमवारी दिवसभर आग विझविणे सुरूच होते.या आगीत कोट्यवधीचे साहित्य होते. ते सर्व जळून खाक झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शार्टसर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सदर झी बाजार हे मागील महिन्यात बंद होते आता पुन्हा नुकतेच सुरू झाले होते.उनी वस्त्रांची दुकाने हलविलीयाच झी बाजाराला लागून तिबेटीयन लोकांचे उनी कपडयांची दुकाने लागली होती. मात्र ही आग वेळीच लक्षात आल्याने उनी कपडयांचे गाठोडे बांधून ते रस्त्यावर जमा करून ठेवल्याने पुढील अनर्थ टळला.सकाळी उसळली गर्दीसदर आग रात्रीच्या सुमारास लागली. त्यामुळे याची माहिती अनेकांना झाली नाही. मात्र पहाटे नागरिक आझाद बागेत फिरायला येऊ लागल्यानंतर झी बाजाराला आग लागल्याची वार्ता सर्वत्र पसरली. त्यानंतर बघ्याची एकच गर्दी उसळली. चंद्रपूर शहर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल होऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले.जीवितहानी टळलीया झी बाजारात सुमारे ३०-४० कर्मचारी काम करतात. यात महिलांचाही समावेश आहे. दिवसभर सर्व कर्मचारी या गजबजलेल्या झी बाजारातच असतात. सदर आग दिवसाच्या सुमारास लागली असती तर एकच तारांबळ उडून मोठा अनर्थ ओढवला असता. मात्र आग सर्व कर्मचारी निघून गेल्यावर रात्रीच्या सुमारास लागली. त्यामुळ जिवितहानी झाली नाही.

टॅग्स :fireआग