शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मूल तालुक्यात रोजगाराअभावी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:26 IST

वाढती बेरोजगारी : शासनाकडून आता उपाययोजनांची गरज

धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्क मूल : तालुक्यातील आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसी आहे. मात्र मागील ३० वर्षांचा कालावधी लोटूनही अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने आजही तालुक्यातील युवकांच्या हाताला काम नसल्याने तालुक्यात बेरोजगार युवकांची फौज निर्माण झाली आहे. उद्योगाअभावी युवक बेरोजगारीच्या खाईत जात असून, रोजगारासाठी युवकांचे बाहेर राज्यात स्थलांतर होत आहे. 

मूल तालुक्यात जोमाने विकास होत असतानाच अपुऱ्या सिंचन सोयी सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जातानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरोशाची झाली आहे. त्यामुळे युवकांचा ओढा औद्योगिक शिक्षणाकडे वळला. तालुक्यात एमआयडीसी असल्याने मोठमोठे उद्योग धंदे स्थापन होतील व आपल्या हाताला काम मिळेल या आशेने अनेक युवकांनी तांत्रिक शिक्षण घेतले. मात्र ३० वर्षांचा कालावधी लोटूनही आकापूर मरेगाव स्थित एमआयडीसी परिसरात अपेक्षित उद्योग स्थापन न झाल्याने सुशिक्षित युवकांची उपेक्षा झाली असून, रोजगाराभावी युवक नैराश्यात सापडला आहे. 

रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी आकापूर मरेगाव स्थित औद्योगिक महामंडळातील भूखंडाचे वाटप करण्यात आले. मात्र अनेक वर्षे लोटूनही उद्योजकांनी उद्योगधंदे उभारले नाही. आजच्या स्थितीत केवळ दोन तीन उद्योग सुरू आहेत. इतर उद्योग सुरू व्हावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी कधीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे हजारो सुशिक्षित युवकांचा हाताला काम नाही. 

बेरोजगार तरुण वळताहेत वाममार्गाकडे शिक्षणाच्या बाजारीकरणात गुरफटल्या गेलेल्या सुशिक्षित ग्रामीण बेरोजगार युवकांचा प्रश्न ऐरणीवर असून हजारो युवक नैराशेत गेले असून, असून झटपट पैसा कमविण्याच्या नादात वाममार्गाला लागले असल्याचे भयावह चित्र तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसत आहे.

"मूल तालुक्यात एमआयडीसी आहे. मात्र या ठिकाणी मोठे उद्योग स्थापन न झाल्याने येथील स्थानिक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे." - कृष्णा कुळमेथे, बेरोजगार युवक

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीchandrapur-acचंद्रपूर