शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

युवापिढींनी अनिष्ठ प्रथांचा नायनाट करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:47 IST

अड्याळ टेकडी सूवर्ण महोत्सवाची तिसºया दिवशी दलितमित्र सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली. विविध जिल्ह्यातून अनेक गणमान्य व्यक्तींसह हजारो गुरुदेवपे्रमी उपस्थित होते.

ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवाचा समारोप : गुरुदेवभक्तांची तुकारामदादांना आदरांजली

संजय अगडे, शरद देवाडे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ टेकडी : अड्याळ टेकडी सूवर्ण महोत्सवाची तिसºया दिवशी दलितमित्र सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाने सांगता झाली. विविध जिल्ह्यातून अनेक गणमान्य व्यक्तींसह हजारो गुरुदेवपे्रमी उपस्थित होते. सकाळी चैतन्य महाराज यांच्या अध्यात्म सत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महिला व युवा संमेलन घेण्यात आले. यावेळी अनिष्ठ रुढींचे उच्चाटन करण्यासाठी युवापिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संजय नाथे तर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापीठाचे डॉ. भाऊ दायदार, माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर व गुरुकुलात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते. या सत्रात गुरुकुलात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांचे मान्यवरांच्या हस्ते विविध भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक साईराम महाराज, ललीता पोईनकर, गणेश नन्नावरे, सुनंदा काळेवार, पितांबर बिलवणे, भगवान मडावी, सुनील राठोड आदींचा समावेश होता. याच सत्रात डॉ. भाऊ दायदार यांनी राष्ट्रसंतांच्या जीवन व कार्यावर विचार मांडले. अध्यक्षीय भाषण संजय नाथे यांनी केले. यानंतर अड्याळ टेकडी तत्त्वज्ञान या विषयावर कार्यगौरव सत्र पार पडले. विविध पुस्तकांचेही प्रकाशनही पार पडले. या सत्रात अड्याळ टेकडीचे प्रमुख लक्ष्मणदादा नारखेडे, चैतन्य महाराज, आचार्य हरिभाऊ वेरुळकर, सत्यपाल महाराज, बंडोपंत बोढेकर, भाऊ थुटे, रामकृष्ण अत्रे महाराज, डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रा. जगनाडे व प्राचार्य कोकोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लक्ष्मणदादा म्हणाले, देशाची परिस्थिती सुधारायची असेल तर ग्रामगीतेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना ग्रामगीता खरेदी करुन ती वाचायला द्या. यावेळी भाऊ दायदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. बलदेव काकडे, सुबोधदादा तर प्रास्ताविक अनिल गुळधे यांनी केले.मातीची भांडी देऊन सत्कारविविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना मातीची भांडी देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण कलावंतांना प्रोत्साहन देणे हा मुख्य हेतू होता.मोहफुलापासून बनविण्यात आलेल्या शिऱ्याचे आकर्षणसमारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी दिवसभर महाप्रसाद वाटप करण्यात आले. या महाप्रसादात मोहफुलापासून बनविण्यात आलेला शिरा सर्वांच्या आकर्षणाचा मेनू ठरला होता. दिवसभर हजारो नागरिकांना शिऱ्याचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.दादांना आदरांजलीपूर्व विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारो गुरुदेव भक्त अड्याळ टेकडींच्या सुवर्ण महोत्सवाकरिता उपस्थित झाले होते. हजारो गुरुदेव भक्तांनी तुकारामदादा गीताचार्य यांच्या प्रेरणा स्थळाचे दर्शन घेऊन अंत:करणातून आदरांजली अर्पण केली.