शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

लेखक, कलावंतांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ ...

चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ भोवतालात लेखक, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा आणि प्रचलित पायवाटा नाकारून पुन्हा ताकदीने लेखन करावे, असे आवाहन नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केले.

ज्येष्ठ लेखिका तथा समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपुरातील तिरूमल्ला सभागृहात शुक्रवारी वाङ्‌मयीन पुरस्कार करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, पुरस्कार विजेत्या अरुण सबाने, शर्वरी पेठकर, डॉ. माधवी भट, डॉ. पद्मरेखा धनकर उपस्थित होते.

डॉ. गिरीश गांधी म्हणाले, लेखिका व समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या लेखनाची उंची मोठी आहे. त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा नव्या पिढीला दिशादर्शक आहे. स्व. जयाताईंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात अपार कृतज्ञतेची भावना आहे. ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्यासारख्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वासोबत समांतर पण परस्परपूरक राहून उंची गाठणारी अशी जोडपी आज कमी होत आहेत. आयटीपासून तर विविध क्षेत्रांत मुले-मुली पुढे जाताना दिसतात. मात्र, संयम सुटून विवाह तुटण्याच्या घटना आपण पाहतो आहोत. त्यामुळे या दोघांचा जीवन प्रवास अभ्यासण्यासारखा आहे, याकडे लक्ष वेधून डॉ. गांधी यांनी आशयसंपन्न लेखन करणाऱ्या चारही पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक भाषणातून पुरस्कार विजेत्यांच्या ग्रंथांची सामर्थ्यस्थळे विशद केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी डॉ. शरद सालफडे व बाळ कुलकर्णी यांना शाल देऊन सत्कार केला. संचालन डॉ. सविता भट यांनी केले. नगरसेवक नंदू नागरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागपूर, वर्धा व चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी सहकार्य केले.

असे आहेत पुरस्कार विजेते

शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी, नाट्य लेखन व अनुवादासाठी डॉ. माधवी भट, कवितांसाठी डॉ. पद्मरेखा धनकर आणि वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांना वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते डॉ. जया द्वादशीवार वाङ्‌मयीन पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली, या शब्दात विजेत्या लेखिकांनी मनोगत व्यक्त केले. पत्नीच्या स्मृतीनिमित्त कुणाचीही मदत न घेता स्वत:च पुरस्कार देण्याची घटना फार दुर्मीळ असून द्वादशीवार ही एक संस्थाच आहे, असा गौरव डॉ. गांधी यांनी केला.