शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

लेखक, कलावंतांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:24 IST

चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ ...

चंद्रपूर : सध्याची परिस्थिती फारशी चांगली नसली तरी नवीन पिढी विविध क्षेत्रांत सक्षमतेने पुढे येताना दिसते. मात्र, आजच्या अस्वस्थ भोवतालात लेखक, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरस्कार पलीकडचाही विचार करावा आणि प्रचलित पायवाटा नाकारून पुन्हा ताकदीने लेखन करावे, असे आवाहन नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी केले.

ज्येष्ठ लेखिका तथा समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपुरातील तिरूमल्ला सभागृहात शुक्रवारी वाङ्‌मयीन पुरस्कार करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मंचावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, पुरस्कार विजेत्या अरुण सबाने, शर्वरी पेठकर, डॉ. माधवी भट, डॉ. पद्मरेखा धनकर उपस्थित होते.

डॉ. गिरीश गांधी म्हणाले, लेखिका व समीक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या लेखनाची उंची मोठी आहे. त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा नव्या पिढीला दिशादर्शक आहे. स्व. जयाताईंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनात अपार कृतज्ञतेची भावना आहे. ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्यासारख्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वासोबत समांतर पण परस्परपूरक राहून उंची गाठणारी अशी जोडपी आज कमी होत आहेत. आयटीपासून तर विविध क्षेत्रांत मुले-मुली पुढे जाताना दिसतात. मात्र, संयम सुटून विवाह तुटण्याच्या घटना आपण पाहतो आहोत. त्यामुळे या दोघांचा जीवन प्रवास अभ्यासण्यासारखा आहे, याकडे लक्ष वेधून डॉ. गांधी यांनी आशयसंपन्न लेखन करणाऱ्या चारही पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक भाषणातून पुरस्कार विजेत्यांच्या ग्रंथांची सामर्थ्यस्थळे विशद केली. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी डॉ. शरद सालफडे व बाळ कुलकर्णी यांना शाल देऊन सत्कार केला. संचालन डॉ. सविता भट यांनी केले. नगरसेवक नंदू नागरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागपूर, वर्धा व चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आयोजनासाठी डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी सहकार्य केले.

असे आहेत पुरस्कार विजेते

शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी, नाट्य लेखन व अनुवादासाठी डॉ. माधवी भट, कवितांसाठी डॉ. पद्मरेखा धनकर आणि वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांना वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते डॉ. जया द्वादशीवार वाङ्‌मयीन पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रत्येकी २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली, या शब्दात विजेत्या लेखिकांनी मनोगत व्यक्त केले. पत्नीच्या स्मृतीनिमित्त कुणाचीही मदत न घेता स्वत:च पुरस्कार देण्याची घटना फार दुर्मीळ असून द्वादशीवार ही एक संस्थाच आहे, असा गौरव डॉ. गांधी यांनी केला.